शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

सहा लाख ५० हजार कोटींचे ‘मुद्रा लोन’ बुडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 15:08 IST

उपजीविका चालविता यावी म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी देशभरात बेरोजगारांना दिल्या गेलेल्या मुद्रा लोनपैकी ७० टक्के कर्जाची परतफेडच झालेली नाही. त्यामुळे सुमारे सहा लाख ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम एनपीए (बुडित) होण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे‘एनपीए’ ७० टक्क्यांवर पोहोचतोय कर्जाची परतफेडच नाही, केवळ व्यापाऱ्यांकडून होतोय परतावा

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपजीविका चालविता यावी म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी देशभरात बेरोजगारांना दिल्या गेलेल्या मुद्रा लोनपैकी ७० टक्के कर्जाची परतफेडच झालेली नाही. त्यामुळे सुमारे सहा लाख ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम एनपीए (बुडित) होण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली. याकारणाने कर्ज वाटणाºया बँकाचे अर्थकारण बिघडले आहे.केंद्र शासनाने ८ एप्रिल २०१५ ला ‘मुद्रा लोन’ ही योजना सुरू केली. शिशू ५० हजार, किशोर पाच लाख तर तरुणांना पाच ते दहा लाख अशी या कर्जाची वर्गवारी होती. या कर्जासाठी कोणतीही हमी, सिक्युरीटी घेतली गेली नाही. ८० टक्के राष्ट्रीयीकृत बँकांनी हे कर्ज वाटप केले. उर्वरित कर्ज वाटप कमर्शियल बँका, एनबीएफसी (नॅशनल बँकींग फायनान्स सर्व्हिसेस) मार्फत केले गेले. आतापर्यंत नऊ लाख ४५ हजार कोटी रुपयांचे वाटप कर्ज स्वरूपात केले गेले. १९ कोटी २४ लाख लोकांना त्याचा लाभ मिळाला. सरासरी प्रत्येकी ४९ हजार ६११ रुपयांच्या कर्जाचा लाभ मिळाला. त्यापैकी गेल्या तीन वर्षात सात कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले गेले.गेल्या पाच वर्षात मुद्रा लोन म्हणून वाटलेल्या कर्जापैकी २३ टक्के रक्कम आताच एनपीए (बुडीत) झाली आहे. तर अगदी लगच्या भविष्यात हा आकडा ७० टक्क्यापर्यंत (सहा लाख ५० हजार कोटी) पोहोचण्याचा अंदाज आहे.जुने-नवे करण्याचा बँकांना सल्लादेशभर सहा लाख ५० हजार कोटी रुपयांचे मुद्रा लोन थकीत होत आहे. हा एनपीए बँकांसाठी अडचणीचा ठरला आहे. म्हणून या कर्जाला आता ‘जुने-नवे’ करण्याचा सल्ला बँकांना दिला गेला आहे. नवे कर्ज देऊन जुन्या कर्जाची वसुली करावी म्हणजे नवे कर्ज एनपीए व्हायला आणखी पाच वर्षे मिळतील असा यामागील अजेंडा आहे. या जुन्या-नव्याच्या माध्यमातून मुद्रा लोनची पर्यायाने केंद्र सरकारची व बँकांची ईभ्रत वाचविण्याचा प्रयत्न होतो आहे.योजना चांगली, पण बँकांचे हिताची नाहीमुद्रा लोनच्या सद्यस्थितीबाबत देशातील अर्थतज्ज्ञांनी आपली मते नोंदविली आहेत. त्यात त्यांनी बहुतांश बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.रघुराम राजन : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, मुद्रा लोन ही योजना सरकारच्या स्तरावर पॉप्युलर आहे. मात्र बँकांच्या हिताची नाही, या योजनेमुळे बँका धोक्यात येण्याची भीती आहे.उर्जित पटेल : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनीसुद्धा मुद्रा लोन अंतर्गत वाटप झालेले कर्ज पुढे बुडित होण्याची शक्यता वर्तविली. मुद्रा लोनचे उद्दीष्ट सरकार निश्चित करीत असल्याने बँकांना कर्ज वाटप करावेच लागते. त्यासाठी अनेक निकष बाजूला ठेवावे लागत आहेत.शशीकांत दास : रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शशीकांत दास यांनी मुद्रा लोन वितरित करताना बँकांनी बारकाईने पहावे, परताव्याची क्षमता तपासावी असा सल्ला दिला आहे. शिवाय मुद्रा लोन एनपीए होत असल्याने बँकींग सिस्टीममध्ये अडचणी निर्माण होण्याचा धोकाही व्यक्त केला आहे.

टॅग्स :Governmentसरकार