शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

उमरखेडमध्ये सिग्नल ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

उमरखेड : येथील संजय गांधी चौकामधील सिग्नल बंद आहे. वाहनधारकांना अपघातापासून वाचविणे हे, सिग्नलचे काम आहे. खांबाला काही दिवसांपूर्वी ...

उमरखेड : येथील संजय गांधी चौकामधील सिग्नल बंद आहे. वाहनधारकांना अपघातापासून वाचविणे हे, सिग्नलचे काम आहे. खांबाला काही दिवसांपूर्वी कंटेनरने धडक दिल्याने खांब खिळखिळा झाला आहे. आता या खांबामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

शहरातील मुख्य चौक असलेल्या संजय गांधी चौकात अनेक वर्षांपासून सिग्नल लावण्याची मागणी होती. दोन वर्षांपूर्वी भारती मैंद सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने सिग्नल लागले. मात्र, सहा-आठ महिन्यातच सिग्नल बंद पडले. काही दिवसांपूर्वी कंटेनरने सिग्नलच्या खांबाला धडक दिली. परिणामी खांब बुडातून खिळखिळा होऊन रस्त्याच्या बाजूला झुकला. हा खांब कधीही पडूून अपघात होण्याची शक्यता आहे.

याबाबत काही संघटनांनी वाहतूक शाखेला अनेकदा कळविले. परंतु वाहतूक शाखेने अद्याप कोणतीही तसदी घेतली नाही. त्यामुळे वाहतूक शाखा एखाद्या अपघाताची वाट पाहते आहे की काय, असा प्रश्न वाहनधारक विचारत आहे. वाहतूक शाखेने अपघातास कारणीभूत ठरू पाहणाऱ्या सिग्नलच्या खांबाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.