शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

पुसद बाजार समितीत शुकशुकाट

By admin | Updated: July 14, 2016 02:33 IST

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा निर्णय शासनाने घेतल्याने या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक झाले

शेतकऱ्यांचे हाल : सोमवारपासून व्यापारी संपावर, अडत वसुलीला विरोध पुसद : शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा निर्णय शासनाने घेतल्याने या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाला असून सलग तिसऱ्या दिवशी बाजार समितीत शुकशुकाट होता. शासनाने बाजार समिती नियमातून फळे, भाजीपाला वगळ्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यात खदखद होती. त्यातच यापुढे शेतमालाच्या विक्रीसाठी आकारली जाणारी तीन टक्के अडत आता खरेदीदारांकडून वसूल करण्याचा निर्णय झाल्याने व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुसद बाजार समितीतील १३० अडते-व्यापारी सोमवारपासून संपात सहभागी झाल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. या बाजार समितीत प्रतिवर्षी सरासरी दोन लाख क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री होते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी फारसा शेतमाल शिल्लक नसला तरी अडचणीतील शेतकरी थोडाफार माल घेवून अडतीवर येतात. मात्र संपामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. बाजारात दिवसभर थांबूनही ग्राहक मिळत नसल्याने शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेला माल एक तर परत घेवून जावा लागत आहे. अथवा कवडीमोल भावाने विक्री करावा लागत आहे. त्यातही किरकोळ बाजारात काही छोटे व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत माल खरेदी करून तो चढ्या भावाने विकत आहेत. दुसरीकडे संपामुळे बाजार समितीत मधील हमाल, तोलाई कामगार या कष्टकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अडत दुकानातील व्यवहार बंद असलयने त्याचा परिणाम इतर बाजारपेठेवर झाला आहे. शेतमाल विक्री करून शेतकरी इतर वस्तूंची खरेदी स्थानिक बाजारपेठेतून करत असतो. त्यामुळे स्थानिक व्यापारी बाजारात व्यवहारावरही परिणाम झाला आहे. संपाचा फटका व्यापाऱ्यांसह ग्राहक, शेतकरी, हमालांना बसत आहे. संपामुळे बाजार समितीचा व्यवहार ठप्प असून अडते, व्यापाऱ्यांशी चर्चा केली. पण तडजोड झाली नाही. शासनाकडून जसे निर्देश येतील त्याची अंमलबजावणी बाजार समिती करेल, अशी माहिती बाजार समितीचे सचिव शिवाजी मगर यांनी दिली. सरकारने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेवून आमच्या मागण्या बाबत सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला अडते व्यापारी मदत करीत असतो, असे मत अडते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय भांगडे यांनी व्यक्त केले. शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी संप पुकारला असून मागील तीन दिवसांपासून आमच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. संप तीन दिवसापासून असला तरी रविवारपासूनच मार्केट बंद आहे. त्यामुळे लवकर हा संप मिटला नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, असे मत शंकर ताडसे हमालाने व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)