शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मंगलाष्टकं संपताच घरी खणला शोषखड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:04 IST

तालुक्यातील मांडवा येथील नवदाम्पत्याने लग्न घटिकेपूर्वी स्वत:च्या घरी शोषखड्डा खणून पाण्याचे जीवनातील महत्त्व गावकरी आणि वऱ्हाड्यांना पटवून दिले.

ठळक मुद्देमांडवाचे नवदाम्पत्य : युवकांपुढे निर्माण केला आदर्श, गावकऱ्यांनी केले कौतुक

विठ्ठल कांबळे ।आॅनलाईन लोकमतघाटंजी : तालुक्यातील मांडवा येथील नवदाम्पत्याने लग्न घटिकेपूर्वी स्वत:च्या घरी शोषखड्डा खणून पाण्याचे जीवनातील महत्त्व गावकरी आणि वऱ्हाड्यांना पटवून दिले.उन्हाळ्यात शहरी असो किंवा ग्रामीण भाग, पाण्याने कासावीस होतो. नागरिक पाण्याच्या समस्येने हैराण झालेले असतात. यावर्षी तर जिल्ह्यातच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे सर्वत्र पाण्याची समस्या आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी मांडवा येथील नवदाम्पत्याने पुढाकार घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. शनिवारी तालुक्यातील मांडवा येथे अंकुश विठ्ठल मडावी यांचा संगिता राजेंद्र बुरगाटे रा.बोथली ता.आर्वी जि.वर्धा यांच्याशी विवाह ठरला होता. ठरल्याप्रमाणे मंगलाष्टक पार पडताच या नवदाम्पत्याने थेट घर गाठले. तेथे शोषखड्ड्याच्या कामाला प्रारंभ केला.मंगलाष्टकानंतर सुलग्न, अशी सर्वत्र पद्धत असते. मात्र अंकुश आणि संगिता यांनी या परंपरेला फाटा देत समाजोपयोगी कार्याला प्राधान्य दिले. त्यांनी मंगलाष्टक होताच वैवाहिक आयुष्यातिल पहिले पाऊल गावाच्या विकासाकरिता उचलले. आधीच ठरविल्याप्रमाणे या नवदाम्पत्याने गावात राबविल्या जात असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमाअंतर्गत स्वत:च्या घरी शोषखड्डा खोदला. त्यांनी पाण्याचे जीवनातील महत्त्व कृतीतून गावकरी व पाहुण्यांना पटवून दिले. याप्रसंगी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे तालुका सचिव प्रदीप रंदये, विजय झाडे, विकेश शेंडे, हेमेंद्र राऊत, निशांत सावसाकडे, वृंदा घोडमारे, बबिता सावसाकडे, गायत्री सावसाकडे, अनिल जांभुळे, शिवाणी आंबेकर, रामचंद्र मडावी, विठ्ठल मडावी, प्रभुदास सिबले, मंगेश मंगरे व पाहुणे उपस्थित होते. गावकºयांनी या उपक्रमाचे कौतुक केले.