शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सात पंचायत समितींचा कारभार प्रभारावरच

By admin | Updated: July 14, 2014 01:39 IST

जिल्ह्यातील ग्रामीण विकासासाठी योजना राबविणाऱ्या पंचायत

रिक्त पदांचा आजार : नऊ सहायक बीडीओंचीही आवश्यकतायवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामीण विकासासाठी योजना राबविणाऱ्या पंचायत समितीमध्येच गटविकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. १६ पैकी सात पंचायत समित्यांना कित्येक वर्षांपासून पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळालेला नाही. तर सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांचीही एकूण नऊ पदे रिक्त आहे. जिल्ह्याची ओळख ही राजकीयदृष्ट्या हेवी वेट नेत्यांचा जिल्हा अशी आहे. येथे येणारा प्रत्येक अधिकारी-कर्मचारी स्थानिक नेते व पक्षाचा म्हणून ओळखल्या जातो. अशा स्थितीत जाणिवपूर्वक पंचायत समितींचा कारभार प्रभारावर ठेवला जात आहे. यवतमाळ पंचायत समितीत कित्येक दिवसांपासून पूर्णवेळ गटविकास अधिकारी नाही. सोयीच्या अधिकाऱ्याकडे प्रभार देऊन मनमर्जीने काम काढून घेण्याचा प्रकार सुरू आहे. नियमबाह्य कामासाठी विरोध होताच अधिकारी बदलविण्याचा फंडाही पदाधिकाऱ्यांकडून वापरल्या जातो. यामुळेच पंचायत राज व्यवस्थेतील अनेक योजनांचा लाभच मिळत नाही. किंबहुणा सक्षम अधिकारी नसल्यामुळे यंत्रणेवरही कोणाचेच नियंत्रण राहात नाही. जिल्ह्यातील वणी, घाटंजी, पांढरकवडा, बाभूळगाव, कळंब, यवतमाळ येथील गटविकास अधिकाऱ्याचे पद अनेक दिवसापासून रिक्त आहे. तर पुसद आणि दिग्रस पंचायत समितीतील गटविकास अधिकारी दीर्घ रजेवर गेले आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने त्या योजनांचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे सहाय्यक बीडीओंचीही नऊ पदे रिक्त आहे. बऱ्याचदा स्थानिक पदाधिकारीच आपल्या राजकीय हितसंबंधांचा उपयोग करून पूर्णवेळ अधिकारी येऊच नये, असा प्रयत्न करतात. आपल्या मर्जीने कारभार चालवण्यासाठी ही सोय केली जाते. या पद्धतीमुळे ग्रामविकासाच्या योजना मात्र रखडलेल्या आहेत. रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जातो. प्रत्यक्षात आज १०० ते २०० वृक्ष लावून त्याचे संगोपन केले, अशी जागाही दाखविण्यासाठी नाही. यावरून इतर योजनांची काय स्थिती असेल, याचा अंदाजा येतो. शासन दरबारी प्रस्त असलेले आमदार, मंत्री व नेते येथे आहेत. त्यांनाही सोयीचे अधिकारी आणण्यातच इंट्रेस असल्याने प्रशासनाची वाताहत झाल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेत कामकाजाचा गाडा हा पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या भरोशावरच हाकला जातो. मात्र हीच जागा रिक्त असल्यामुळे कामकाजाची गतीच कमी करण्यात आली आहे. विकासाच्या गप्पा करणाऱ्या पदाधिकारी व नेत्यांना अडथळा ठरणारी ही उणिव दूर करण्यासाठी वेळ नाही. एखाद्या सर्वसाधारण कर्मचाऱ्याची बदली करण्यासाठी आपली प्रतिष्ठा खर्च करणाऱ्या या नेते व पदाधिकाऱ्यांना ग्रामीण जनतेचे सोयर सुतूक नसल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)