शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

संचमान्यतेचा तिढा सुटता सुटेना

By admin | Updated: August 21, 2015 02:59 IST

शैक्षणिक सत्र २०१५-१६ सुरू झाले, तरी अजूनही २०१४-१५ च्या संचमान्यता शाळांना प्राप्त झाल्या नाही. मागीलवर्षी सर्व शाळांनी आॅनलाईन संचमान्यता पाठविल्या होत्या.

वणी : शैक्षणिक सत्र २०१५-१६ सुरू झाले, तरी अजूनही २०१४-१५ च्या संचमान्यता शाळांना प्राप्त झाल्या नाही. मागीलवर्षी सर्व शाळांनी आॅनलाईन संचमान्यता पाठविल्या होत्या. मात्र त्यांना अद्याप मूर्तरूप आले नाही.शाळेतील वर्ग तुकड्या व विद्यार्थी संख्या किती आहे, यावरून शाळेला मान्य होणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंजूर होतात. तेवढ्याच कर्मचाऱ्यांचे वेतन शासन अदा करते. शालेय वेळापत्रकानुसार अध्यापन होण्यासाठी शाळेत आवश्यक शिक्षक कार्यरत असणे गरजेचे असते. मंजूर शिक्षकांपेक्षा कमी शिक्षक असल्यास, त्या शाळेला शिक्षक नियुक्त करण्याची परवानगी देणे, शाळेत जादा शिक्षक असल्यास त्यांचे समायोजन इतर शाळेतील रिक्त जागांवर करण्याची प्रक्रिया शिक्षणाधिकारी यांना करावी लागते. मात्र मागील दोन वर्षांपसून ही प्रक्रियाच ठप्प पडली आहे. सन २०१३-१४ च्या संचमान्यता घाईघाईने शाळांना देण्यात आल्या. मात्र त्या संचमान्यतेनुसार शाळांना ना जादा पदे भरण्यास मिळाली, ना अतिरिक्त पदांचे समायोजन झाले. केवळ अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाईनमध्ये टाकून त्यांना समूहापासून वेगळे करण्यात आले. आरटीईनुसार व्यपगत झालेल्या पदांवरील कर्मचाऱ्यांचे काय करायचे, याची उकल शासन अजूनही करू शकले नाही. त्यामुळे राज्यातील हजारो प्रयोगशाळा परिचर व नाईक अद्याप अधांतरीच लटकलेले आहे. त्यातील काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्या कमी करता येते. मात्र शासन पदोन्नती देण्यास तयार नाही. नाईकांची शिपाई या पदावर पदावनती करण्यास मात्र शासन राजी आहे. या सर्व गोंधळामुळे सन २०१४-१५ च्या संचमान्यता अजूनही तयार झाल्या नाही. मोफत सक्तीच्या शिक्षणाच्या अध्यादेशाने त्यात आणखीनच गोंधळ वाढविला आहे. स्तर रचना बदलविल्याने त्यानुसार शाळांची फेररचना करण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. या अध्यादेशामध्ये पहिली ते आठवीसाठी मंजूर शिक्षकांची पदे, ही विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर ठरविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची पदे ही दरवर्षी बदलत जाणार आहे. त्यासाठी शाळांच्या संचमान्यता दरवर्षी आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणे आवश्यक आहे. नववी ते बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांची पदे कार्यभारावरून ठरविली जाणार आहे. त्यामुळे एकाच शाळेत पाचवी ते दहावीचे वेळापत्रक तयार करताना विषमता निर्माण होत आहे. या गोंधळामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने कार्यरत शिक्षकांवर कार्यभाराचे ओझे वाढले आहे. काही शाळांमध्ये अधिक शिक्षक असल्याने थोड्या कामात पूर्ण वेतन त्यांच्या हाती पडत आहे. आॅनलाईन व आॅफलाईन वेतनामुळे शाळांच्या इतर कपातीचा भरणा करताना व त्याचे हिशेब लिहिताना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे सन २०१४-१५ च्या संचमान्यता केव्हा हाती पडते व त्यानुसार शिक्षणाचा गाडा केव्हा सुरळीत होतो, याची प्रतीक्षा सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी व व्यवस्थापन या सर्वांनाच लागली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)