शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

साश्रू नयनांनी राधाला अखेरचा निरोप

By admin | Updated: May 31, 2014 00:11 IST

कालपर्यंत त्या घराला तिचे बोबडे बोल आणि हसतमुख चेहर्‍याची सवय झाली होती. तिच्या हसण्याने घरात आनंदाला उधाण यायचे. मात्र अचानक तिला ताप आला आणि यातच तिची अखेर झाली.

डेंग्यूचा बळी : जवळगावातील प्रत्येक जण हळहळला किशोर वंजारी - नेरकालपर्यंत त्या घराला तिचे बोबडे बोल आणि हसतमुख चेहर्‍याची सवय झाली होती. तिच्या हसण्याने घरात आनंदाला उधाण यायचे. मात्र अचानक तिला ताप आला आणि यातच तिची अखेर झाली. जवळगाव येथील राधा गुघाणे या निष्पाप बालिकेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला आणि गावाचे काळीज थरथरून गेले. तिचे कलेवर गावात आणले तेव्हा प्रत्येकाच्या मनात चर्र होत होते. अखेर नियतीपुढे गावकरी हतबल झाले. जड अंत:करणाने आणि साश्रू नयनांनी जवळगावकरांनी राधाला अखेरचा निरोप दिला.नेर तालुक्यातील जवळगाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. यापूर्वीसुद्धा एका बालिकेचा मृत्यू झाला. गावामध्ये तापाने फनफनणारी अनेक बालके असल्यामुळे गावात भीतीयुक्त वातावरण आहे. अनेकांनी आपल्या मुलांना परगावी नेवून ठेवले आहे. आरोग्य विभागाने गावामध्ये शिबिर लावले होते. कोरडा दिवसही पाळण्यात आला होता. मात्र मृत्यूचे हे तांडव थांबायला तयार नाही. कोवळ्या कळ्या अचानक मृत्यूच्या खाईत लोटल्या जात आहे. राधाच्या मृत्यूने संपूर्ण गाव हादरले आहे. राधा अनेकांची लाडकी होती. न बोलाविता कुणाच्याही घरी जावून आपल्या बोबड्या बोलांनी ती अनेकांना मोहीत करायची. राधा गेल्याची वार्ता ऐकताच गावाच्या अंत:करणात गलबल झाली. अनेकांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली. आपल्या लाडक्या लेकीच्या मृत्यूने राधाचे आई-वडील स्तब्ध झाले आहेत. कालपर्यंत अंगाखांद्यावर खेळणारी चिमुकली अचानक निघून गेल्यामुळे राधाच्या आई-वडिलांना सुचेनासे झाले आहे. राधावर नुकतेच जवळगाववासीयांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. कुठल्याही लोकप्रतिनिधीला याची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून गावात डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू आहे. जिल्ह्याचा आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीचे राजकारण विकासाच्या आड येत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी गावात अस्वच्छतेने कहर केला आहे. या आजाराचे मूळ काय, हे अजूनही लक्षात आले नसले तरी राधाचा झालेला मृत्यू हा डेंग्यू या आजारानेच झाला आहे. जवळगावपासून प्राथमिक आरोग्य केंद्र २५ किलोमीटर अंतरावर आहे. नागरिकांना पायपीट करत तेथे जावे लागते. राधाच्या मृत्यूच्या पार्श्‍वभूमीवर जवळगाववासीयांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची मागणी केली आहे. प्रशासन आणखी किती राधाच्या बळी जाण्याची वाट पाहात आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जावू लागला आहे.