शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

साश्रू नयनांनी राधाला अखेरचा निरोप

By admin | Updated: May 31, 2014 00:11 IST

कालपर्यंत त्या घराला तिचे बोबडे बोल आणि हसतमुख चेहर्‍याची सवय झाली होती. तिच्या हसण्याने घरात आनंदाला उधाण यायचे. मात्र अचानक तिला ताप आला आणि यातच तिची अखेर झाली.

डेंग्यूचा बळी : जवळगावातील प्रत्येक जण हळहळला किशोर वंजारी - नेरकालपर्यंत त्या घराला तिचे बोबडे बोल आणि हसतमुख चेहर्‍याची सवय झाली होती. तिच्या हसण्याने घरात आनंदाला उधाण यायचे. मात्र अचानक तिला ताप आला आणि यातच तिची अखेर झाली. जवळगाव येथील राधा गुघाणे या निष्पाप बालिकेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला आणि गावाचे काळीज थरथरून गेले. तिचे कलेवर गावात आणले तेव्हा प्रत्येकाच्या मनात चर्र होत होते. अखेर नियतीपुढे गावकरी हतबल झाले. जड अंत:करणाने आणि साश्रू नयनांनी जवळगावकरांनी राधाला अखेरचा निरोप दिला.नेर तालुक्यातील जवळगाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. यापूर्वीसुद्धा एका बालिकेचा मृत्यू झाला. गावामध्ये तापाने फनफनणारी अनेक बालके असल्यामुळे गावात भीतीयुक्त वातावरण आहे. अनेकांनी आपल्या मुलांना परगावी नेवून ठेवले आहे. आरोग्य विभागाने गावामध्ये शिबिर लावले होते. कोरडा दिवसही पाळण्यात आला होता. मात्र मृत्यूचे हे तांडव थांबायला तयार नाही. कोवळ्या कळ्या अचानक मृत्यूच्या खाईत लोटल्या जात आहे. राधाच्या मृत्यूने संपूर्ण गाव हादरले आहे. राधा अनेकांची लाडकी होती. न बोलाविता कुणाच्याही घरी जावून आपल्या बोबड्या बोलांनी ती अनेकांना मोहीत करायची. राधा गेल्याची वार्ता ऐकताच गावाच्या अंत:करणात गलबल झाली. अनेकांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली. आपल्या लाडक्या लेकीच्या मृत्यूने राधाचे आई-वडील स्तब्ध झाले आहेत. कालपर्यंत अंगाखांद्यावर खेळणारी चिमुकली अचानक निघून गेल्यामुळे राधाच्या आई-वडिलांना सुचेनासे झाले आहे. राधावर नुकतेच जवळगाववासीयांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. कुठल्याही लोकप्रतिनिधीला याची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून गावात डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू आहे. जिल्ह्याचा आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीचे राजकारण विकासाच्या आड येत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी गावात अस्वच्छतेने कहर केला आहे. या आजाराचे मूळ काय, हे अजूनही लक्षात आले नसले तरी राधाचा झालेला मृत्यू हा डेंग्यू या आजारानेच झाला आहे. जवळगावपासून प्राथमिक आरोग्य केंद्र २५ किलोमीटर अंतरावर आहे. नागरिकांना पायपीट करत तेथे जावे लागते. राधाच्या मृत्यूच्या पार्श्‍वभूमीवर जवळगाववासीयांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची मागणी केली आहे. प्रशासन आणखी किती राधाच्या बळी जाण्याची वाट पाहात आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जावू लागला आहे.