शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या संपामुळे सरपंच संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 21:48 IST

सचिवांच्या विविध मागण्या असल्या तरी त्यापैकी आवश्यक मागण्या मान्य कराव्यात, अशी सरपंचांची भूमिका आहे. राज्य व जिल्हास्तरावरील मागण्यांवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यांच्या रास्त मागण्या मान्य करून संपावर तोडगा काढावा, अशी मागणी सरपंचांनी सीईओंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद सीईओंंना निवेदन : ग्रामीण भागातील विकास कामांचा खोळंबा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे ग्रामीण भागात विकासाचा खोळंबा होत आहे. ग्रामपंचायती अनाथ झाल्या आहे. ग्रामसेवकांच्या संपावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी सरपंचांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.ग्रामसेवकांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गावांचा विकास ठप्प झाला आहे. पावसाळ्यामुळे ग्रामीण भागात बदलत्या वातावरणातून आरोग्य समस्या वाढल्या आहे. साथीचे रोग बळावत आहेत. याशिवाय कर वसुली व विविध कामे खोळंबली आहे. संपामुळे सरपंच हतबल झाले आहे. सचिव कामावर नसल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या संतापाला सरपंचांना सामोरे जावे लागत आहे.सचिवांच्या विविध मागण्या असल्या तरी त्यापैकी आवश्यक मागण्या मान्य कराव्यात, अशी सरपंचांची भूमिका आहे. राज्य व जिल्हास्तरावरील मागण्यांवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यांच्या रास्त मागण्या मान्य करून संपावर तोडगा काढावा, अशी मागणी सरपंचांनी सीईओंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. पालकमंत्री, महसूल राज्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी गहुली हेटी, लासीना, चिचबर्डी, टेंभुरणीचे सरपंच संदेश राठोड, कन्हैया राठोड, जयश्री राठोड, महादेव वाघाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत