शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

ग्रामसेवकांच्या संपामुळे सरपंच संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 21:48 IST

सचिवांच्या विविध मागण्या असल्या तरी त्यापैकी आवश्यक मागण्या मान्य कराव्यात, अशी सरपंचांची भूमिका आहे. राज्य व जिल्हास्तरावरील मागण्यांवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यांच्या रास्त मागण्या मान्य करून संपावर तोडगा काढावा, अशी मागणी सरपंचांनी सीईओंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद सीईओंंना निवेदन : ग्रामीण भागातील विकास कामांचा खोळंबा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे ग्रामीण भागात विकासाचा खोळंबा होत आहे. ग्रामपंचायती अनाथ झाल्या आहे. ग्रामसेवकांच्या संपावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी सरपंचांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.ग्रामसेवकांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गावांचा विकास ठप्प झाला आहे. पावसाळ्यामुळे ग्रामीण भागात बदलत्या वातावरणातून आरोग्य समस्या वाढल्या आहे. साथीचे रोग बळावत आहेत. याशिवाय कर वसुली व विविध कामे खोळंबली आहे. संपामुळे सरपंच हतबल झाले आहे. सचिव कामावर नसल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या संतापाला सरपंचांना सामोरे जावे लागत आहे.सचिवांच्या विविध मागण्या असल्या तरी त्यापैकी आवश्यक मागण्या मान्य कराव्यात, अशी सरपंचांची भूमिका आहे. राज्य व जिल्हास्तरावरील मागण्यांवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यांच्या रास्त मागण्या मान्य करून संपावर तोडगा काढावा, अशी मागणी सरपंचांनी सीईओंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. पालकमंत्री, महसूल राज्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी गहुली हेटी, लासीना, चिचबर्डी, टेंभुरणीचे सरपंच संदेश राठोड, कन्हैया राठोड, जयश्री राठोड, महादेव वाघाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत