शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तेच पॅकेज, तीच आकडेमोड अन् सर्वेक्षण

By admin | Updated: December 15, 2014 23:10 IST

निवडणुका झाल्या, नवीन सरकार आले. परंतु शेतकऱ्यांच्या वाट्याला तेच पॅकेज तीच आकडेमोड आणि तेच सर्वेक्षण येत आहे. राज्य सरकारने सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मंगळवारी केंद्रीय

अशोक काकडे - पुसद निवडणुका झाल्या, नवीन सरकार आले. परंतु शेतकऱ्यांच्या वाट्याला तेच पॅकेज तीच आकडेमोड आणि तेच सर्वेक्षण येत आहे. राज्य सरकारने सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मंगळवारी केंद्रीय समिती जिल्ह्यात येत आहे. मात्र या आकडेमोड आणि पाहणी पेक्षा शेतकऱ्यांना थेट मदतीची गरज आहे. याकडे कुणाचेच लक्ष नाही. दुष्काळाच्या आगीत शेतकरी होरपळत आहे. ग्रामीण भागात संपूर्ण वातावरण ढवळून निघत आहे. दररोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आज शेती सोडून मजुरीसाठी जात आहे. जगाचा पोशिंदा म्हणविणारा शेतकरी आता नावालाच उरला आहे. शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने त्याला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तीन वर्षांपासून पुसद तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. गतवर्षी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतजमीन खरडून गेली. यंदा निसर्गाने दगा दिला. सोयाबीन व कापसाचे उत्पन्न अत्यल्प झाले. शासनाने सोयाबीनला सहा हजार तर कापसाला सात हजार रुपये हमी भाव जाहीर करावा यासाठी राजकीय तथा सामाजिक आंदोलने झाली. परंतु कापसाला केवळ चार हजार रुपये भाव मिळत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. शेतात सिंचनाच्या सुविधा आहे. परंतु भारनियमनाचे भूत मानगुटीवर आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची तर याही पेक्षा बिकट परिस्थिती आहे. घरात दाणा नाही अशा स्थितीत शासनाने जिल्ह्याची पैसेवारी ४६ टक्के घोषित केली. परंतु उपाययोजना दिसत नाही. थकीत वीज बिल शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करीत आहे. तीन महिन्याचे १२०० रुपये माफ करण्यापेक्षा सरसकट कृषिपंपाचे वीज बिलच माफ करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. शेतीवर आधारित व्यवस्था बळकट करण्यासाठी पाहिजे तसे पाऊले उचलली गेली नाही. शेतकरी स्वावलंबी व्हावा, शेतीला जोडधंदा उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. नापिकी, कर्जबाजारीपणा, निसर्गाचे असंतुलन आणि त्यातून निर्माण झालेले नैराश्य यामुळे शेतकरी आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी स्वावलंबी नसल्याने त्यांच्या नैराश्य दिसून येत आहे.पुसद तालुक्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची भाषा बोलणारे नेते आता गप्प बसले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर असणारी संघटनाही कुठे गेली याचा शोध घ्यावा लागत आहे. कुणालाही शेतकऱ्यांचे देणे घेणे नाही. शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी सर्वप्रथम त्यांचा सातबारा कोरा करावा लागेल. शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला उत्पादनावर आधारित हमी भाव द्यावा लागेल.शेती सिंचनासाठी नव्याने रोहित्र बसविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि रोजगार हमीच्या कामात वाढ करण्याची गरज आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे गरजेचे आहे. शेतीसोबत जोडधंद्यासाठी अतिरिक्त अर्थसहाय्य देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये आलेले नैराश्य दूर करण्यासाठी समुपदेशनाचीही गरज आज निर्माण झाली आहे.