शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओं’नी उडविली तारांबळ

By admin | Updated: December 19, 2015 02:27 IST

येथील विश्रामगृहात शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शिबिर घेण्यात आले. या शिबिरामुळे वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली.

वाहनांची रांग : वणी येथील विश्रामगृहात भरली वाहनांची जत्रावणी : येथील विश्रामगृहात शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शिबिर घेण्यात आले. या शिबिरामुळे वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. खुद्द ‘आरटीओं’नीच तारांबळ उडविल्यामुळे गोची झाली. येथे दर महिन्याला उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे निश्चित तारखेला वाहन चालक परवाना, वाहन तपासणी शिबिर घेतले जाते. शुक्रवारी विश्रामगृहात हे शिबिर घेण्यात आले. त्यासाठी सकाळपासूनच वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहनधारक विश्रामगृह परिसरात दाखल होऊ लागले होते. परिणामी सकाळी ११ वाजतापर्यंत विश्रामगृहाला वाहनांच्या जत्रेचे स्वरूप आले होते. सर्व दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी होती. आरटीओ विभागाचे अधिकारी, कर्मचारी आल्यानंतर शिबिराला सुरूवात झाली. यावेळी चालक परवाना, वाहन पासींग आदींसाठी वाहनधारकांची मोठी रांग लागली होती. बाजूला सर्व वाहने उभी होती. विश्रामगृहाच्या प्रवेशव्दारापासून शिबिरस्थळी पोहोचण्यासाठी वाहनधारकांनाच कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या दोन्ही कडेला अस्ताव्यस्त वाहने उभी असल्याने मागाहून येणाऱ्या वाहनधारकांना विश्रामगृहात प्रवेश करणेही कठीण झाले होते. येथील विश्रामगृहात माणसे कमी आणि वाहनेच जादा दिसत होती. मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाने शिबिरासाठी कोणतीही खास व्यवस्था केली नव्हती. एवढेच नव्हे, तर वाहनधारकांनाही वाहन कसे व कुठे पार्किंग करावे, याबाबत साधी सूचना दिली गेली नाही. त्यामुळे शुक्रवारी येथील विश्रामगृह परिसराला वाहनांच्या जत्रेचे स्वरूप आले होते. (कार्यालय प्रतिनिधी)संपामुळे प्रवाशांची कुचंबणागुरूवारपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे येथील आगारातून एकही बस सुटली नाही. परिणामी प्रवासी खासगी वाहतुकीवर अवलंबून होते. त्यातच शुक्रवारी येथे शिबिर झाले. या शिबिरात मोठ्या प्रमाणात आॅटो आणि चारचाकी वाहने विविध कामासाठी आली होती. त्यामुळे नेहमी निश्चित मार्गावर धावणारी अनेक वाहनेही बंद होती. त्याचा फटका प्रवाशांना बसला. एसटी बंद असल्यामुळे बहुतांश प्रवासी याच वाहनांवर अवलंबून होते. मात्र त्यापैकी बहुतांश वाहने तपासणीसाठी आल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. खुद्द ‘आरटीओं’नीच प्रवाशांची तरांबळ उडविली, असे काही प्रवासी सांगत सुटले होते. पुढील शिबिर घेताना वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, याची दक्षता घेणे आता गरजेचे झाले आहे.