शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

रस्ते अडकले जाचक अटीत

By admin | Updated: August 29, 2016 01:03 IST

निसर्ग सौंदर्याचे भरभरुन दान मिळालेल्या उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील नागरिकांना अत्यंत खराब रस्त्यांमुळे मरणयातना सोसाव्या लागत आहेत.

नागरिकांना मरणयातना : सहस्त्रकुंड पर्यटनस्थळ उपेक्षितच उमरखेड : निसर्ग सौंदर्याचे भरभरुन दान मिळालेल्या उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील नागरिकांना अत्यंत खराब रस्त्यांमुळे मरणयातना सोसाव्या लागत आहेत. अभयारण्याच्या जाचक अटींमुळे रस्ते आणि बंदी भागातील एकंदरच विकास कामे अडकली आहे. उमरखेड तालुक्यात पैनगंगा अभयारण्य आहे. ब्रिटीशकाळापासून या जंगलातील ४० गावांना बंद भाग म्हणून ओळखले जाते. ब्रिटीशांनी आपल्या सोईसाठी सर्वसामान्य नागरिकांना या भागापासून दूर ठेवले. मात्र आता स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाल्यानंतरही बंदी भागात जाताना नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागतात. रस्ते म्हणजे विकासाचे पहिले पाऊल. परंतु बंदी भागातील रस्त्यांना रस्ते म्हणावे काय असा प्रश्न आहे. उमरखेडपासून हरदडापर्यंत थोडातरी चांगला रस्ता आहे. परंतु पुढे रस्ताच नाही. त्यानंतर रस्त्यावर खड्डे की खड््यात रस्ते अशी अवस्था आहे. रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. तुटलेल्या रस्त्यांमुळे वाहनांची वर्दळ तुरळक असते. खासगी वर्दळ तुरळक असते. खासगी वाहने या भागात जायला अजिबात तयार नसतात. राज्य परिवहन महामंडळाची एखादी बस सुरू असते. त्यामुळे प्रत्येक थांब्यावर नागरिक तासन्तास उभे असतात. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे बस नादुरुस्त होणे ही नित्याचीच बाब आहे. लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाताना कसरत करावी लागते. बंदी भागातील नागरिकांनी रस्त्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. आत्मदहनाचा इशारा दिला. निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तरीही रस्ते झाले नाही. जिल्ह्यातील पर्यटनाचा मानबिंदू म्हणून मुरली येथील सहस्त्रकुंड धबधबा ओळखला जातो. पैनगंगेवरील हा जलप्रपात पाहण्यासाठी शेकडो पर्यटक येतात. परंतु रस्ते पाहून एकदा गेलेला पर्यटक दुसऱ्यांदा येत नाही. महत्वाचे म्हणजे सहस्त्रकुंडपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ताच नाही. पर्यटनस्थळ म्हणून शासनाकडून कुठलाही निधी आजपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे या स्थळाचा विकासही होऊ शकला नाही. निवडणुकीच्या काळात बंदी भागातील नागरिकांना विविध समस्या सोडविण्याची आश्वासने दिली जातात. लोकप्रतिनिधी घोषणांचा पाऊस पाडतात. मात्र एकदा निवडणूक आटोपली की, पुढील पाच वर्ष कुणीही येऊन पाहत नाही. आता या गोष्टीची येथील जनतेलाही सवय झाली आहे. (शहर प्रतिनिधी)1जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह कोणत्याही प्रश्नावर तत्काळ रिझल्ट देतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा बंदी भागात व्यक्त केली जात आहे. 2उमरखेड तालुक्यातील गाडीबोरी, थेरडी, खरबी, दराटी, सोनदाभी, जवराळा, मोरचंडी, पिंपळगाव, मुरली, सहस्त्रकुंड, मथुरानगर, जेवली, एकंबा अशा गावांमध्ये सुविधांचा अभाव आहे. तरुणांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासकीय योजना केवळ कागदोपत्रीच दिसतात. 3बंदी भागात असलेली आरोग्य यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. त्यामुळे कुणी आजारी पडल्यास त्याला उमरखेड किंवा नांदेडला न्यावे लागते. वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांना नेताना कसरत करावी लागते. अनेक प्रसूती तर भर रस्त्यात बैलगाडीमध्ये होतात. काही रुग्णांना गावातच वनौषधी घेऊन समाधान मानावे लागते. साप, विंचू, इंगळी चावली तर उपचारासाठी ढाणकी किंवा उमरखेडला आणेपर्यंत जीव गमावण्याची वेळ येते.