शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

रस्ते अडकले जाचक अटीत

By admin | Updated: August 29, 2016 01:03 IST

निसर्ग सौंदर्याचे भरभरुन दान मिळालेल्या उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील नागरिकांना अत्यंत खराब रस्त्यांमुळे मरणयातना सोसाव्या लागत आहेत.

नागरिकांना मरणयातना : सहस्त्रकुंड पर्यटनस्थळ उपेक्षितच उमरखेड : निसर्ग सौंदर्याचे भरभरुन दान मिळालेल्या उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील नागरिकांना अत्यंत खराब रस्त्यांमुळे मरणयातना सोसाव्या लागत आहेत. अभयारण्याच्या जाचक अटींमुळे रस्ते आणि बंदी भागातील एकंदरच विकास कामे अडकली आहे. उमरखेड तालुक्यात पैनगंगा अभयारण्य आहे. ब्रिटीशकाळापासून या जंगलातील ४० गावांना बंद भाग म्हणून ओळखले जाते. ब्रिटीशांनी आपल्या सोईसाठी सर्वसामान्य नागरिकांना या भागापासून दूर ठेवले. मात्र आता स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाल्यानंतरही बंदी भागात जाताना नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागतात. रस्ते म्हणजे विकासाचे पहिले पाऊल. परंतु बंदी भागातील रस्त्यांना रस्ते म्हणावे काय असा प्रश्न आहे. उमरखेडपासून हरदडापर्यंत थोडातरी चांगला रस्ता आहे. परंतु पुढे रस्ताच नाही. त्यानंतर रस्त्यावर खड्डे की खड््यात रस्ते अशी अवस्था आहे. रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. तुटलेल्या रस्त्यांमुळे वाहनांची वर्दळ तुरळक असते. खासगी वर्दळ तुरळक असते. खासगी वाहने या भागात जायला अजिबात तयार नसतात. राज्य परिवहन महामंडळाची एखादी बस सुरू असते. त्यामुळे प्रत्येक थांब्यावर नागरिक तासन्तास उभे असतात. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे बस नादुरुस्त होणे ही नित्याचीच बाब आहे. लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाताना कसरत करावी लागते. बंदी भागातील नागरिकांनी रस्त्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. आत्मदहनाचा इशारा दिला. निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तरीही रस्ते झाले नाही. जिल्ह्यातील पर्यटनाचा मानबिंदू म्हणून मुरली येथील सहस्त्रकुंड धबधबा ओळखला जातो. पैनगंगेवरील हा जलप्रपात पाहण्यासाठी शेकडो पर्यटक येतात. परंतु रस्ते पाहून एकदा गेलेला पर्यटक दुसऱ्यांदा येत नाही. महत्वाचे म्हणजे सहस्त्रकुंडपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ताच नाही. पर्यटनस्थळ म्हणून शासनाकडून कुठलाही निधी आजपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे या स्थळाचा विकासही होऊ शकला नाही. निवडणुकीच्या काळात बंदी भागातील नागरिकांना विविध समस्या सोडविण्याची आश्वासने दिली जातात. लोकप्रतिनिधी घोषणांचा पाऊस पाडतात. मात्र एकदा निवडणूक आटोपली की, पुढील पाच वर्ष कुणीही येऊन पाहत नाही. आता या गोष्टीची येथील जनतेलाही सवय झाली आहे. (शहर प्रतिनिधी)1जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह कोणत्याही प्रश्नावर तत्काळ रिझल्ट देतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा बंदी भागात व्यक्त केली जात आहे. 2उमरखेड तालुक्यातील गाडीबोरी, थेरडी, खरबी, दराटी, सोनदाभी, जवराळा, मोरचंडी, पिंपळगाव, मुरली, सहस्त्रकुंड, मथुरानगर, जेवली, एकंबा अशा गावांमध्ये सुविधांचा अभाव आहे. तरुणांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासकीय योजना केवळ कागदोपत्रीच दिसतात. 3बंदी भागात असलेली आरोग्य यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. त्यामुळे कुणी आजारी पडल्यास त्याला उमरखेड किंवा नांदेडला न्यावे लागते. वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांना नेताना कसरत करावी लागते. अनेक प्रसूती तर भर रस्त्यात बैलगाडीमध्ये होतात. काही रुग्णांना गावातच वनौषधी घेऊन समाधान मानावे लागते. साप, विंचू, इंगळी चावली तर उपचारासाठी ढाणकी किंवा उमरखेडला आणेपर्यंत जीव गमावण्याची वेळ येते.