शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

पावसाच्या दडीने पिके धोक्यात

By admin | Updated: August 14, 2014 00:08 IST

दुबार, तिबार पेरणीने हवालदिल झालेल्या बळीराजापुढे आता पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यात येण्याचे संकट निर्माण झाले आहे. जमीन कडक आल्याने कोवळी रोपं जगवायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

निश्चल गौर - डोंगरखर्डा दुबार, तिबार पेरणीने हवालदिल झालेल्या बळीराजापुढे आता पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यात येण्याचे संकट निर्माण झाले आहे. जमीन कडक आल्याने कोवळी रोपं जगवायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. दोन पेरण्यांसाठी झालेल्या अवाढव्य खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षी निसर्गाची अवकृपा सातत्याने सुरू आहे. सुरुवातीला दोनही नक्षत्रात पावसाने दडी मारली. थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र १५ ते २० दिवसपर्यंत पावसाचा थेंबही न आल्याने बियाणे जमिनीतच गाडली गेली. यासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज अंगावर बसले. यातूनही सावरत खासगी सावकार किंवा इतर ठिकाणाहून पैशाची जुळवाजुळव करत दुबार पेरणी केली. आता गेली काही दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहे. परिसराच्या नांझा, डोंगरखर्डा, मेटीखेडा, जोडमोहा आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कपाशी आणि सोयाबीनचे पीक घेतले आहे. काही शेतकऱ्यांना तिबार पेरणीही करावी लागली. वेळोवेळी पेरण्या उलटल्याने खर्चाची बाजू कमकुवत होत गेली. आताही पावसाची कुठलीही चिन्हे दिसत नाही. रोपं माना टाकत आहे. जमीन कडक आल्याने रोपाच्या मुळा सोकत चालल्या आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकणार आहे.हीच परिस्थिती राहिल्यास पहिल्या पेरणीसाठी घेतलेले बँकेचे कर्ज, दुसऱ्या पेरणीसाठी सावकारांकडून घेतलेली कर्जाऊ रक्कम आणि वर्षभराचा गाडा चालवायचा कसा याची चिंता आतापासूनच शेतकऱ्यांना लागली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र पाऊस कमी झाल्याने शेतातील जलस्रोतही फार काळ टिकेल याची शास्वती नाही. गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवूनही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अनेकांनी यावर्षी पीक विम्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. आता उन्हामुळे पिके होरपळत आहे. गतवर्षीचा पीक विमा त्वरित लागू करून वाटप करावा आणि यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.