शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
2
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
3
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
4
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
5
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
8
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
9
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
10
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
11
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
12
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

पावसाच्या दडीने पिके धोक्यात

By admin | Updated: August 14, 2014 00:08 IST

दुबार, तिबार पेरणीने हवालदिल झालेल्या बळीराजापुढे आता पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यात येण्याचे संकट निर्माण झाले आहे. जमीन कडक आल्याने कोवळी रोपं जगवायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

निश्चल गौर - डोंगरखर्डा दुबार, तिबार पेरणीने हवालदिल झालेल्या बळीराजापुढे आता पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यात येण्याचे संकट निर्माण झाले आहे. जमीन कडक आल्याने कोवळी रोपं जगवायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. दोन पेरण्यांसाठी झालेल्या अवाढव्य खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षी निसर्गाची अवकृपा सातत्याने सुरू आहे. सुरुवातीला दोनही नक्षत्रात पावसाने दडी मारली. थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र १५ ते २० दिवसपर्यंत पावसाचा थेंबही न आल्याने बियाणे जमिनीतच गाडली गेली. यासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज अंगावर बसले. यातूनही सावरत खासगी सावकार किंवा इतर ठिकाणाहून पैशाची जुळवाजुळव करत दुबार पेरणी केली. आता गेली काही दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहे. परिसराच्या नांझा, डोंगरखर्डा, मेटीखेडा, जोडमोहा आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कपाशी आणि सोयाबीनचे पीक घेतले आहे. काही शेतकऱ्यांना तिबार पेरणीही करावी लागली. वेळोवेळी पेरण्या उलटल्याने खर्चाची बाजू कमकुवत होत गेली. आताही पावसाची कुठलीही चिन्हे दिसत नाही. रोपं माना टाकत आहे. जमीन कडक आल्याने रोपाच्या मुळा सोकत चालल्या आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकणार आहे.हीच परिस्थिती राहिल्यास पहिल्या पेरणीसाठी घेतलेले बँकेचे कर्ज, दुसऱ्या पेरणीसाठी सावकारांकडून घेतलेली कर्जाऊ रक्कम आणि वर्षभराचा गाडा चालवायचा कसा याची चिंता आतापासूनच शेतकऱ्यांना लागली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र पाऊस कमी झाल्याने शेतातील जलस्रोतही फार काळ टिकेल याची शास्वती नाही. गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवूनही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अनेकांनी यावर्षी पीक विम्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. आता उन्हामुळे पिके होरपळत आहे. गतवर्षीचा पीक विमा त्वरित लागू करून वाटप करावा आणि यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.