शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

हद्दवाढीने लोहारातील उद्योगनगरवासी उघड्यावर

By admin | Updated: May 18, 2016 02:45 IST

नगरपरिषदेच्या हद्दवाढीने लोहारा येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये असलेल्या उद्योगनगरातील नागरिक उघड्यावर आले आहेत.

यवतमाळ : नगरपरिषदेच्या हद्दवाढीने लोहारा येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये असलेल्या उद्योगनगरातील नागरिक उघड्यावर आले आहेत. मूलभूत सोयी सुविधांसाठी जायचे कुणाकडे हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. आंदोलन करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे गाव कृती समिती स्थापन्यात आली. त्यांनी भोयर ग्रामपंचायतीत जाण्याचा ठराव घेतला आहे.हद्दवाढीत लोहारा ग्रामपंचायतीत असलेली एमआयडीसी परिसरातील वसाहत वगळण्यात आली. हा निर्णय कॅबिनमध्ये बसून घेतला. अधिकारी वर्गाने यामुळे काय अडचणी निर्माण होतील याचा विचार केला नाही. भीषण पाणीटंचाईच्या काळात टँकर कोणाकडे मागायचा, घरकुलाची योजना, विविध दस्तावेजासाठी लागणारे दाखल कोणाकडे मागायचे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नगरपरिषद हद्दवाढ जानेवारी महिन्यात करण्यात आली. त्यानंतर पाच महिने लोटूनही उद्योगनगर परिसरासाठी कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. १९८५ पासून लोहारा ग्रामपंचायतीत सन्मानाने वास्तव्य करणाऱ्या उद्योगनगरवासीयाना आता स्वत:ची ओळख कायम ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी ६ मे रोजी ग्रामसभा घेऊन लगतच्या भोयर ग्रामपंचायतीत जाण्याचा निर्णय घेतला. या ठरावाची प्रत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. या सोबतच आमदार मदन येरावर यांचे शिफारसपत्रही देण्यात आले आहे. यावर जिल्हा परिषद सीईओ काय निर्णय घेतात, की हा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठविला जाणार हे अजूनही स्पष्ट झाले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)