शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कीटकनाशके कंपन्यांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:10 IST

शेतकºयांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे.

ठळक मुद्देकारवाईची धास्ती : हजारो लिटर कीटकनाशकांची रात्रीतून वाहतूक

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकºयांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे. अनेक विक्रेत्यांनी आपल्याकडील साठा कंपन्यांना पाठविणे सुरू केले असून गत चार दिवसात हजारो लिटर कीटकनाशके रात्रीतून हलविण्यात आले. ही वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले.यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा झाल्याने १९ शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला. फवारणी शेतकºयांच्या जीवावर उलटल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम १२ सप्टेंबर रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाºयांनी यवतमाळात धाव घेतली. आता या विषबाधेची वरिष्ठ पातळीवरून कारणमिमांसा सुरु आहे. अनेकांवर कारवाईचे संकेत आहे. अशा परिस्थितीत आपण कसे निर्दोष आहोत याचा निर्वाळा प्रत्येक जण देत आहेत. प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. कृषी विभागानेही हंगामापूर्वी करायची गोदाम तपासणी १९ जणांचे बळी गेल्यानंतर सुरू केली आहे. कृषी साहित्य विक्रेते व काही प्रतिबंधित कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणे सुरू केले. आतापर्यंत सात जणांवर कारवाई करून कृषी यंत्रणा पुन्हा थंडावली आहे. याचा फायदा कृषी विक्रेत्यांनी घेत कीटकनाशकांनी भरलेले गोदाम रिकामे करण्याचा सपाटा लावला आहे.जिल्ह्यातील बहुतांश कृषी केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा साठा आहे. धाड पडल्यास कारवाईचा बडगा नको म्हणून अनेकांनी आता या साठ्याची विल्हेवाट लावणे सुरू केले आहे. दिवसभर दुकानाचे शटर बंद करून कीटकनाशकांचे पॅकिंग केले जाते. रात्री १० वाजता वाहनातून ही कीटकनाशके हलविली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून हा प्रकार सर्वत्र सुरू आहे.प्रस्तुत प्रतिनिधीने, या प्रकरणाचा भंडाफोड केला. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दत्त चौक परिसरात एका कृषी केंद्रासमोर एका मेटॅडोअरमध्ये कीटकनाशके भरली जात होती. चौकशी केली असता उरलेले बियाणे व कीटकनाशके कंपनीला परत पाठवित असल्याचे सांगितले. मात्र शटर बंद करून काही लोक आतमध्ये पॅकिंगचे काम करीत होते. याबाबत विचारले असता त्यांनी शटर उघडले. परंतु माहिती देताना त्यांची बोबडी वळल्याचे दिसत होते. येथे तणनाशक, कीटकनाशके आणि प्रतिबंधित असलेल्या पीजीआरचा साठा आढळून आला. या गोदामाची अवस्था पाहता त्यातील बराचसा माल या अगोदरच रफादफा केल्याचे दिसत होते. हा प्रकार गत चार दिवसांपासून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून मिळाले. असाच प्रकार यवतमाळसह इतरही ठिकाणी सुरू असल्याची माहिती आहे.कीटकनाशक विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू झाल्याने कंपन्यांचे मार्केटिंग अधिकारी, कर्मचारीसुद्धा यवतमाळात मुक्कामी होेते. त्यांच्याच सल्ल्यानुसार हा माल कंपन्यांकडे परत पाठविला जात आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाहन भरताना हे अधिकारीही तेथे उपस्थित होते. विशेष म्हणजे कारवाईच्या भीतीने अनेक मान्यता प्राप्त औषधांचा साठा देखील कंपन्यांना परत पाठविण्याचा सपाटा लावला आहे.रिटेलरकडील औषधी होलसेलरकडेकारवाईची धास्ती शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील कृषी साहित्य विक्रेत्यांनी घेतली आहे. त्यांच्याकडे असलेला कीटकनाशकांचा साठा जिल्हास्तरीय विक्रेत्यांकडे आणून दिला आहे. आता जिल्हास्तरावरील हा साठा नागपूर, अकोला, बुलडाणा आदी शहरात हलविला जात आहे.