शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

पुनर्गठित कर्जाची मुदत वितरणापूर्वीच संपली

By admin | Updated: August 1, 2016 00:43 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील कर्जाचे पुनर्गठन करून तत्काळ कर्ज वितरणाचे आदेश शासनाने दिले होते.

५० हजार शेतकरी अडचणीत : राष्ट्रीयकृत बँकांनी थांबविले काम रूपेश उत्तरवार यवतमाळ शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील कर्जाचे पुनर्गठन करून तत्काळ कर्ज वितरणाचे आदेश शासनाने दिले होते. मात्र पुनर्गठित कर्जाचे संपूर्ण वितरण होण्यापूर्वीच मुदत संपली. त्यातच राष्ट्रीयकृत बँकांनी मुदत संपल्याचे कारण पुढे करीत कर्ज पुनर्गठन थांबविले आहे. परिणामी जिल्ह्यातील ५० हजार शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँक कर्ज पुनर्गठनास तयार असली तरी या बँकेला पुरेसा निधीच मिळाला नाही. सततच्या नापिकीने जिल्ह्यातील शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला. कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. त्यामुळे बँकेचे दरवाजे अशा शेतकऱ्यांना बंद झाले होते. त्यावर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांकडील कर्जाचे पुनर्गठन करण्याचे ठरविले. त्यानुसार जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि ग्रामीण बँकेला तसे आदेशही निर्गमित करण्यात आले. जिल्हा बँकेला २९ हजार ५५१ शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठन करून कर्ज वितरणाचे आदेश देण्यात आले. या शेतकऱ्यांना २१७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा बँकेला पुरेसा निधी मिळाला नाही. त्यामुळे इच्छा असूनही शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकले नाही. अशा स्थितीत कर्ज पुनर्गठनाची मुदत संपली. कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला निधी मिळताच पुनर्गठनासाठी संचालक मंडळाचा ठराव घेऊन ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. सर्वाधिक अडवणूक होत आहे ती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये. कर्ज पुनर्गठनाची ३१ जुलै ही अंतिम तारीख होती. या कालावधीत ५६ हजार शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठन करणे गरजेचे होते. परंतु सुरुवातीपासूनच या बँकांनी कर्ज प्रक्रियेत नकारघंटा वाजविली. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी बँकर्स कमिटीच्या बैठकीत आदेश दिल्यानंतर काही प्रमाणात कर्ज पुनर्गठनाला वेग आला. परंतु त्यानंतरही या बँकांनी अडवणुकीचेच धोरण अवलंबिले. तांत्रिक बाबी आणि विविध अडचणी पुढे केल्या. लिंक फेलचे कारण पुढे करून अनेक शेतकऱ्यांना बँकातून परत पाठविले. त्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजनेचे कारण पुढे करीत ३१ जुलैची प्रतीक्षा केली. ३१ जुलै संपताच या राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज पुनर्गठनासाठी हात वर केले. विशेष म्हणजे या बँकांनी नियमित कर्जाचे उद्दीष्टही पूर्ण केले नाही. या बँका कुणालाही जुमानत नसल्याचे दिसत आहे. अशीच स्थिती ग्रामीण बँकेची असून जिल्ह्यातील सुमारे ५० हजार शेतकरी यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. तीन वर्षापर्यंत कोरडा दुष्काळ झेलणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा ओल्या दुष्काळाचे संकट पुढे आले आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित आहे. बहुतांश राष्ट्रीयकृत बँका कर्ज वितरणात ३० टक्केच स्टेट बँक आॅफ हैदराबाद, सेंट्रल बँक, स्टेट बँके ने एकूण उद्दिष्टाच्या ७० टक्के कर्जाचे वाटपच केले नाही. अर्ज द्या कर्ज घ्या योजनेमध्ये स्टेट बँक आणि विदर्भ कोकण बँकेकडे शेतकऱ्याचे अनेक अर्ज पडून आहेत. मात्र त्यांना कर्ज मिळाले नाही. या शेतकऱ्यांना तांत्रिक बाजू समजून घेऊन कर्ज वितरित करण्यात येणार आहे. यासंदर्भात आपण आरबीआयकडे तक्रार दाखल करणार असल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.