शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांची भीस्त वर्गणीवर

By अविनाश साबापुरे | Updated: January 21, 2024 19:02 IST

केंद्रासाठी निधीच नाही : तालुकास्तरासाठी मिळणारा पैसाही अपुरा.

 यवतमाळ : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खेळ व क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धाही घेतल्या जात आहेत. मात्र केंद्र स्तरीय स्पर्धेसाठी निधीच नाही. तर तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी अपुरा निधी मिळत असल्याने यजमान शाळांनाच लोकवर्गणी करून स्पर्धा घ्यावी लागत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत निधीची मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये साधारणत: एक लाख ७५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी सांघिक व वैयक्तिक क्रीडा सामने, तसेच त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धाही केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर घेतल्या जातात. स्पर्धेची पहिली फेरी केंद्र स्तरावर होत असून स्पर्धेकरिता कोणताही निधी उपलब्ध होत नाही. शिक्षकांकडून वर्गणी करून तसेच शाळा संलग्नता फी संकलीत करून गोळा होणाऱ्या निधीतील ५० टक्के रक्कम खर्च करून सामने पार पाडले जातात. तसेच शाळांकडे खेळ व क्रीडा यासाठी स्वतंत्र निधी नसतो. मैदान तयार करणे, खेळ साहित्य खरेदी, उद्घाटन कार्यक्रम, पारितोषिक हा खर्च आयोजक शाळेला करावा लागतो. त्यासाठी शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

दुसऱ्या फेरीचे आयोजन तालुका स्तरावर केले जाते. तालुक्यातील एखाद्या केंद्रातील शाळेला यजमान पद देऊन आयोजन केले जाते. विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील प्रत्येक केंद्राची चमू स्पर्धेत सहभागी होत असून सुमारे दोन हजार खेळाडू विद्यार्थी सहभागी होतात. यावेळी उद्घाटन, चहापान, पारितोषिक, क्रीडा साहित्य खरेदी, मंडप, लाउडस्पीकर, पाणी आदी खर्चासह विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. जिल्हा स्तरावरुन उपलब्ध होणाऱ्या ५० हजार रुपयांत सदर खर्च भागवणे शक्य होत नाही. त्यामुळे शिक्षकांसह सामान्य नागरिकांकडून लोकवर्गणी केली जाते. क्रीडा साहित्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे तालुकास्तरीय स्पर्धेकरिता दोन लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने सीईओ डाॅ. मैनाक घोष यांच्याकडे निवेदन दिले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा नेते ज्ञानेश्वर नाकाडे, जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे, जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर, सुभाष पारधी, संदीप टुले आदी उपस्थित होते. प्रत्येक केंद्राला १० हजार, तालुक्याला दीड लाख द्यासन २०१७ पर्यंत केवळ सांघिक खेळ घेतले जात होते. पण आता वैयक्तिक क्रीडा प्रकारांचाही समावेश करण्यात आला. कबड्डी, लंगडी व खो-खो, धावणे, उंच उडी, लांब उडी, कॅरम, बॅडमिंटन, भालाफेक, थाळीफेक, टेनिक्वाइट, योगासने आदी स्पर्धा घेण्यात येत आहेत. परंतु, केंद्रस्तरीय सामन्यांसाठी कोणताही निधी मिळत नाही. तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा सामन्यांचे आयोजन सध्यस्थितीत उपलब्ध होणाऱ्या निधीत कठीण जात आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्राला १० हजार रुपये व तालुका स्तरीय स्पर्धेला दीड लाख रुपये अनुदानाची तरतूद जिल्हा परिषद निधीतून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ