शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

रेती चोरट्यांकडून १६ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: December 20, 2015 02:39 IST

गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कळंब महसूल विभागाने कारवाईची धडक मोहीम राबविली.

नऊ जणांवर गुन्हा : ७९ जणांवर कारवाईकळंब : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कळंब महसूल विभागाने कारवाईची धडक मोहीम राबविली. या अंतर्गत १६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एका आर्थिक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ७९ लोकांकडून दंड आकारणी करण्यात आली. एवढेच नव्हे, तर नऊ लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. सर्वाधिक प्रकरणे रेती चोरीचे आहे. केवळ दोन प्रकरणे मुरुम चोरीचे आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त रेती चोरटे वर्धा जिल्ह्यातील आहे. महसूल विभागाच्या या धडक मोहिमेनंतर सर्रासपणे चोरटी वाहतूक बंद आहे. असे असले तरी, अधूनमधून चोरीचे प्रकार उघडकीस येत आहे. संपूर्ण रेती चोरी थांबविणे महसूल प्रशासनाला अजूनही जमलेले नाही.फौजदारी कारवाई झालेल्यांमध्ये नितीन रघाटाटे, चेतन डहाके, दिलबाग पड्डा, नरेश डेहनकर, अमोल गुल्हाने, नरेश पाटील, शेख अशफाक शेख रज्जाक, अशोक मालखुरे, अमर दातार आदींचा समावेश आहे. ७९ लोकांना गौण खनिज चोरताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला. तांबा घाटातून चोरटी वाहतुकबाभूळगाव हद्दीतील तांबा घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. रेती जरी बाभूळगाव तालुक्यातील घाटातील असली तरी, ती कळंब तालुक्याच्या हद्दीतून कळंब व बाभूळगावकडे नेली जाते. एवढेच नव्हे, तर नदीच्या पैलरीरावरुन वर्धा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक केली जात आहे. याकडे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)