शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

पाणी पुरवठा समितीकडून वसुली करा

By admin | Updated: July 5, 2017 00:11 IST

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत रखडलेल्या, अपूर्ण पाणीपुरवठा योजनांच्या गावांतील समितीकडून तातडीने निधीची वसुली करावी, ...

जलव्यवस्थापन : जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश, पोलिसांत तक्रार दाखललोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत रखडलेल्या, अपूर्ण पाणीपुरवठा योजनांच्या गावांतील समितीकडून तातडीने निधीची वसुली करावी, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी दिले. जलव्यवस्थापन समितीची बैठक मंगळवारी माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी यवतमाळ तालुक्यातील तीन, आर्णी, घाटंजी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यातील प्रत्येकी एक, राळेगाव व दारव्हामधील प्रत्येकी तीन गावांमधील पाणीपुरवठा योजना रखडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे बहुतांश ठिकाणी सदर समित्यांनी निधीची उचल केली आहे. निधीची उचल करूनही त्यांनी योजनेचे काम पूर्ण केले नाही. या सर्व गावांमधील पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीकडून या निधीची येत्या ३१ जुलैपर्यंत तातडीने वसुली करण्याचे निर्देश अध्यक्ष माधुरी आडे यांनी दिले. यापैकी काही गावांमधील समिती पदाधिकारी व सदस्यांविरूद्ध थेट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उर्वरित रखडलेल्या पाणीपुरवठा योजना आता चौदाव्या वीत्त आयोगाच्या निधीतून करण्याचे निर्देेशही यावेळी देण्यात आले. बैठकीत पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी तब्बल दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.मागणी १५० कोटींची, मिळाले ११ कोटीजिल्हा परिषदेने शौचालयांसाठी तब्बल १५० कोटींच्या निधीची राज्य शासनाकडे मागणी केली होती. मात्र शासनाकडून केवळ ११ कोटी मिळाले. या तोकड्या निधीतून शौचालयांची कामे पूर्ण कशी करावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही कामे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. मात्र निधीअभावी स्वच्छ भारत मिशनचे काम रखडण्याची शक्यता बळावली आहे.