शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

गैरआदिवासींना दिलेले लाभ वसूल करा; केंद्र सरकारचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 11:27 IST

आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागांवर नोकरी पटकावणाऱ्या गैरआदिवासींना केंद्राने मोठा फटका दिला आहे. २००९ नंतर अशा कर्मचाऱ्यांनी जे आर्थिक लाभ घेतले आहेत, ते सर्व वसूल करावे, असे आदेश केंद्र सरकारच्या कार्मिक-प्रशिक्षण विभागासह वित्त विभागानेही दिले आहेत.

ठळक मुद्दे बँका, रेल्वे, एलआयसी, वित्त कंपन्या, महामंडळातील कर्मचाऱ्यांवर बडगा

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागांवर नोकरी पटकावणाऱ्या गैरआदिवासींना केंद्राने मोठा फटका दिला आहे. २००९ नंतर अशा कर्मचाऱ्यांनी जे आर्थिक लाभ घेतले आहेत, ते सर्व वसूल करावे, असे आदेश केंद्र सरकारच्या कार्मिक-प्रशिक्षण विभागासह वित्त विभागानेही दिले आहेत. बँका, रेल्वे, एलआयसी, वित्तीय कंपन्या आणि महामंडळांतील गैरआदिवासी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या सेवेत अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर लागलेल्या कोष्टी, हलबा कोष्टी यांच्या नोकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कार्मिक व प्रशिक्षण विभागाने १० ऑगस्ट २०१० रोजी परिपत्रक जारी केले होते. या विरोधात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनने ९ जानेवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने १५ सप्टेंबर २०१७ रोजी दिलेल्या निर्णयात केंद्राचे हे परिपत्रकच रद्द ठरविले. त्यामुळे सरकारला घटनाबाह्य असलेले आपलेच परिपत्रक ३० ऑगस्ट २०१८ रोजी मागे घ्यावे लागले आणि गैरआदिवासींवर कारवाई करण्याचे सर्व विभागांना आदेश द्यावे लागले.तरीही अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नव्हती. अखेर फेडरेशनच्या पाठपुराव्यानंतर भारत सरकारच्या वित्त विभागाने १२ मार्च रोजी आपल्या अधिनस्त असलेले सर्व विभाग, सार्वजनिक बँका, रिझर्व्ह बँक, वित्तीय कंपन्या, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तर कार्मिक व प्रशिक्षण विभागानेही ८ एप्रिल रोजी परिपत्रक काढून अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर नोकरी मिळविणाऱ्या कोष्टी, हलबा कोष्टी जातीच्या कर्मचाऱ्यांना २८ नोव्हेंबर २००० पर्यंतच संरक्षण दिले. त्यानंतर मात्र अनुसूचित जमातीचे घेतलेले लाभ वसूल करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता सर्वसाधारण प्रवर्गात शेवटच्या बिंदूनंतर धरावी, असे या आदेशात म्हटले आहे.सर्वसाधारण प्रवर्गातील बेरोजगारांना फटकाकेंद्र सरकारकडून सर्व विभागांना गैरआदिवासी कर्मचाºयांवर कारवाईचे आदेश जारी झाले आहे. २८ नोव्हेंबर २००० पूर्वी अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर केंद्र सरकारच्या सेवेत लागलेल्या गैरआदिवासींचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील रिक्त जागा प्रभावित होणार आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार युवकांना याचा जबर फटका बसणार आहे.

संघटना यासंदर्भात गेल्या १५ वर्षांपासून न्यायालयीन लढा लढत आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयानेच दणका दिला आणि केंद्र सरकारलाही हा आदेश काढावा लागला. मात्र, अशा कर्मचाऱ्यांना २००० पर्यंत संरक्षण देण्याच्या निर्णयाविरुद्धही पुनर्विलोकन याचिका तयार आहे. त्याच्या खर्चाची तरतूद राज्य शासनाने करावी.- प्रा. मधुकर उईके, केंद्रीय अध्यक्ष,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन

टॅग्स :Governmentसरकार