शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

शिधापत्रिका जीर्ण

By admin | Updated: May 4, 2015 00:05 IST

पुरवठा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिधापत्रिकांना तब्बल १६ वर्ष झाली असल्याने त्या जीर्ण झालेल्या आहेत.

लाभार्थ्यांना त्रास : संगणकीकृत पत्रिकेची ग्रामीणांना प्रतीक्षा विनोद कापसे मांगलादेवीपुरवठा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिधापत्रिकांना तब्बल १६ वर्ष झाली असल्याने त्या जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना संगणकीकृत पत्रिका येईस्तोवर दुसरी प्रत मिळावी, अशी अपेक्षा आहे. लाभार्थ्यांकडे असलेल्या काही शिधापत्रिका अत्यंत खराब झाल्या आहे. काही शिधापत्रिकांवरील नावसुद्धा ओळखू येत नाही. धान्य किती दिले, कोणत्या महिन्यात दिले याची नोंद शिधापत्रिकेत घेतली जाते, त्यानंतर त्याच पानावर रॉकेलची कोणत्या महिन्यात किती उचल केली याचीसुद्धा नोंद होते. अशा महत्त्वपूर्ण शिधापत्रिका एवढ्या जीर्ण झाल्या की त्यावर कुठलीही नोंद घेता येत नाही. पाने पलटवितानाच फाटली जातात. याचा फटका लाभार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे नेमके किती युनीटला किती धान्य मिळते, किती रॉकेल मिळते याचा पत्ताच लागत नाही. काही गावांचे रेशनकार्ड लगतच्या गावांना जोडलेले आहे. नागरिक मजूरी बुडवून रेशन, रॉकेल आणण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तरे न देता परत पाठविले जाते. रॉकेल परवानाधारकाचीसुद्धा परिसरात मनमानी सुरू आहे. कार्डधारकांना त्यांच्या युनीटप्रमाणे नियमित रॉकेल उपलब्ध करून दिले जात नाही. महिन्याच्या शेवटच्या दिवसाला रॉकेल आणून महिना संपला आता दुसऱ्या महिन्यात या, असे सांगितले जाते. किती युनीटला किती रॉकेल मिळेल, किती दराने मिळेल याची माहिती बऱ्याच रॉकेल परवानाधारकांकडे नाही. त्यामुळे जास्तीचे दर आकारून लाभार्थ्यांची लूट होताना दिसत आहे. शिधापत्रिका जीर्ण झाल्याचे त्यांचे अधिकच फावते. काही जागरूक नागरिकच तहसीलपर्यंत जावून विशिष्ट रक्कम भरून नवीन शिधापत्रिका प्राप्त करून घेतात. परंतु जे मजूरी बुडवून तहसीलपर्यंत जावू शकत नाही वा तेथील कार्यप्रणालीबाबत अनभिज्ञ आहेत त्यांची कोंडी होताना दिसत आहे.अन्न सुरक्षा योजनेच्या लाभासाठी पात्र कुटुंबाची नावेही डाटा एन्ट्रीमध्ये नाहीत. एकाच्या नावे तर चक्क १७ फॉर्म आले आहेत व जे या योजनेस पात्र आहेत, त्यांची नावे नसल्यामुळे योजनेच्या लाभापासून ते वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुका प्रशासनाने गायब झालेल्या रेशनकार्डधारकांची नावे डाटा एन्ट्रीत समाविष्ट करावी, अशी मागणी आहे.शासनाने गोरगरिबांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ लागू केल्याने अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गरजूंना मिळावा म्हणून प्रत्येक गावातील रेशनकार्डधारकाची संगणकीकृत यादी बनविण्यात आली आहे. मात्र प्रशासनाच्या वेळकाढू कारभारामुळे डाटा एन्ट्रीत अनेक शिधापत्रिकाधारकांची नावे नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी लाभार्थ्यांकडून आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक तसेच अन्य माहिती पुरवठा विभागाकडे जमा करण्यात आली होती. परंतु अनेक शिधापत्रिकाधारकांची नावेच नोंदविली गेली नाही.