शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

राळेगाव बाजार समितीचे शेतकरी हिताकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 15, 2015 01:44 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताकडे दुर्लक्ष केले. परिणामी शेतकऱ्यांनी या संस्थेकडे पाठ फिरविली आहे.

सेसचे नुकसान : कापूस व धान्याची होत आहे खुल्या बाजारात विक्रीराळेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताकडे दुर्लक्ष केले. परिणामी शेतकऱ्यांनी या संस्थेकडे पाठ फिरविली आहे. कापूस व धान्य खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जात आहे. मात्र या प्रकारातही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. राळेगाव, वाढोणाबाजार, वडकी येथे खासगी व्यापाऱ्यांनी कापूस व धान्य खरेदी मोठ्या प्रमाणात खुलेआम सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर, वजन आणि चुकाऱ्यात संरक्षण मिळणे कठीण झाले आहे. वजनात फसगत, कमी दर आणि वेळेवर पूर्ण पैसा मिळेलच याची खात्री उरलेली नाही. बाजार समितीत धान्य व कापूस खरेदी सुरू झाली असली तरी बाहेर सुरू असलेली अवैध खरेदी रोखण्यासाठी समितीने आजपर्यंत एकदाही, एकाही प्रकरणात कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे खासगी खरेदीदारांचे चांगलेच फावले आहे. शिवाय या संस्थेचे सेसपोटी अतोनात नुकसान होत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डवर पणन आणि सीसीआयची खरेदी दिवाळीपूर्वी सुरू व्हावी यादृष्टीने कोणतेही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे या काळात अनेकदा हमी भावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी झाली आहे. मार्केट यार्डवर कापसाचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्या जिनिंगमध्ये गाडी खाली करताना भाव कमी केला जात असल्याच्या तक्रारी राहिल्या आहे. हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला, पण बाजार समितीने स्वत:चा मोठा धर्मकाटा अद्यापही दुरुस्त केला नाही. त्यामुळे कापूस वाहनाचे वजन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना वजनाची वेळीच शहानिशा करून घेणे अशक्य झाले आहे. बाजार समिती शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करत असल्याने आता सहकार विभागानेच या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबी मिळवून देण्यात याव्या, अशी मागणी करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)