शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

७३ दिवसांत १६ दिवस पाऊस

By admin | Updated: August 13, 2014 00:02 IST

गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या महागाव तालुक्यावर यंदा मात्र वरूण राजा रुसल्याचे दिसत आहे. पावसाच्या ७३ दिवसांत केवळ १६ दिवसच पाऊस कोसळला असून तालुक्यात

महागाव : गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या महागाव तालुक्यावर यंदा मात्र वरूण राजा रुसल्याचे दिसत आहे. पावसाच्या ७३ दिवसांत केवळ १६ दिवसच पाऊस कोसळला असून तालुक्यात आतापर्यंत २१० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची गडद छाया असून शेतकरी हवालदिल झाले आहे. गतवर्षी महागाव तालुक्यात एकही दिवस असा जात नव्हता की पाऊस आला नाही. पावसाला थांब म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सततच्या पावसाने शेतामधील पिके उद्ध्वस्त झाली होती. अनेक शेतात तर १५-१५ दिवस गुडघाभर पाणी होते. अतिवृष्टीने गतवर्षीचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यानंतर रबी हंगामात गारपीट आली. यातही प्रचंड नुकसान झाले. यावर्षी सुरुवातीला हवामान खात्याने समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने मशागत करून पेरणीची तयारी केली. मात्र आकाशात ढग दिसतच नव्हते. मृग, रोहिणी, आर्द्रा आदी पावसाचे नक्षत्र कोरडे गेले. अशा स्थितीत धूळ पेरणी केलेले शेतकरी उद्ध्वस्त झाले. मध्यंतरी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यांच्यावरही दुबार पेरणीची वेळ आली. आता तर गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यात कुठेही पाऊस कोसळला नाही. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिके धोक्यात आली आहे. महागाव तालुक्यात गतवर्षी ५४ दिवसात १४०० मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा पाऊसच यायला तयार नाही. जुन-जुलै आणि आॅगस्ट अर्धा महिना निघून गेला. पावसाच्या ७३ दिवसांपैकी केवळ १६ दिवस पाऊस कोसळला. यामुळे तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची गडद छाया आहे. शेतातील पिके सुकली असून नदी-नालेही कोरडे आहे. या भीषण टंचाईचा फटका जनावरांनाही बसत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल दिसत आहे. पाणीपुरवठा योजनेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. महागाव शहराला दरडोई ४० लिटर पाणी याप्रमाणे तीन लाख लिटर पाण्याची गरज आहे. परंंतु एवढे पाणी उपलब्ध होत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून महागावची पाणीपुरवठा योजना बंद आहे. अशा स्थितीत पाऊस आला नाही तर काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने पाणी टंचाईचा कृती आराखडा उन्हाळ्यात मंजूर केला. मात्र त्यातील उपाययोजना करण्यातच आल्या नाही. (शहर प्रतिनिधी)