शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
१५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
5
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
6
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
7
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
8
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
9
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
10
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
11
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
12
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
13
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
14
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
15
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
16
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
17
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
18
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
19
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
20
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक

७३ दिवसांत १६ दिवस पाऊस

By admin | Updated: August 13, 2014 00:02 IST

गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या महागाव तालुक्यावर यंदा मात्र वरूण राजा रुसल्याचे दिसत आहे. पावसाच्या ७३ दिवसांत केवळ १६ दिवसच पाऊस कोसळला असून तालुक्यात

महागाव : गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या महागाव तालुक्यावर यंदा मात्र वरूण राजा रुसल्याचे दिसत आहे. पावसाच्या ७३ दिवसांत केवळ १६ दिवसच पाऊस कोसळला असून तालुक्यात आतापर्यंत २१० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची गडद छाया असून शेतकरी हवालदिल झाले आहे. गतवर्षी महागाव तालुक्यात एकही दिवस असा जात नव्हता की पाऊस आला नाही. पावसाला थांब म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सततच्या पावसाने शेतामधील पिके उद्ध्वस्त झाली होती. अनेक शेतात तर १५-१५ दिवस गुडघाभर पाणी होते. अतिवृष्टीने गतवर्षीचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यानंतर रबी हंगामात गारपीट आली. यातही प्रचंड नुकसान झाले. यावर्षी सुरुवातीला हवामान खात्याने समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने मशागत करून पेरणीची तयारी केली. मात्र आकाशात ढग दिसतच नव्हते. मृग, रोहिणी, आर्द्रा आदी पावसाचे नक्षत्र कोरडे गेले. अशा स्थितीत धूळ पेरणी केलेले शेतकरी उद्ध्वस्त झाले. मध्यंतरी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यांच्यावरही दुबार पेरणीची वेळ आली. आता तर गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यात कुठेही पाऊस कोसळला नाही. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिके धोक्यात आली आहे. महागाव तालुक्यात गतवर्षी ५४ दिवसात १४०० मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा पाऊसच यायला तयार नाही. जुन-जुलै आणि आॅगस्ट अर्धा महिना निघून गेला. पावसाच्या ७३ दिवसांपैकी केवळ १६ दिवस पाऊस कोसळला. यामुळे तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची गडद छाया आहे. शेतातील पिके सुकली असून नदी-नालेही कोरडे आहे. या भीषण टंचाईचा फटका जनावरांनाही बसत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल दिसत आहे. पाणीपुरवठा योजनेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. महागाव शहराला दरडोई ४० लिटर पाणी याप्रमाणे तीन लाख लिटर पाण्याची गरज आहे. परंंतु एवढे पाणी उपलब्ध होत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून महागावची पाणीपुरवठा योजना बंद आहे. अशा स्थितीत पाऊस आला नाही तर काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने पाणी टंचाईचा कृती आराखडा उन्हाळ्यात मंजूर केला. मात्र त्यातील उपाययोजना करण्यातच आल्या नाही. (शहर प्रतिनिधी)