शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

पावसाची दडी बियाणे - कंपन्यांच्या पत्थ्यावर

By admin | Updated: June 28, 2014 23:46 IST

मृग नक्षत्रात जिल्ह्यात एक पाऊस झाला. या भरवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. बीज अंकुरेल अशी आशा त्यांना होती. मात्र बहुतांश ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडे धाव घेतली.

शेतकरी सैरभैर : कृषी केंद्र संचालकांचे हात वररूपेश उत्तरवार - यवतमाळमृग नक्षत्रात जिल्ह्यात एक पाऊस झाला. या भरवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. बीज अंकुरेल अशी आशा त्यांना होती. मात्र बहुतांश ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडे धाव घेतली. तेथे त्यांची निराशा केली. ‘आमचे बियाणे चांगले आहे, पावसाअभावी उगवण झाली नाही’, अशी भूमिका विक्रेत्यांनी घेतली. एकूणच पावसाची दडी कंपन्या आणि विके्रत्यांच्या पत्थ्यावर पडली. वास्तविक बाजारात बोगस बियाणे आल्याची बाब सर्वश्रुत आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने घेतलेल्या बियाण्यांच्या २२ नमुन्यांचा अहवाल फेल आला. २५० क्विंटल बियाणे परत करण्यात आले. मात्र या कंपन्यांचे नाव कृषी विभागाने गुलदस्त्यात ठेवले. कृषी विभागाच्या बाहेर जिल्ह्यातील भरारी पथकाने बोगस बियाणे जिल्ह्यात जप्त केले. कपाशीचे पॅकेट्स तयार करणाऱ्या बियाणे कंपनीचे घबाड बाहेर आले. यासारखे अनेक प्रकार पेरणीच्या तोंडावरच उघड झाले. परवाना न मिळालेल्या कंपन्यांनी थेट गावामध्ये बियाण्यांची विक्री केली. पेरणीनंतर १२ ते १५ दिवस लोटल्यानंतरही बियाणे उगवले नाही. वरुणराजाने पाठ फिरविणे ही बाबच बोगस कंपन्यांच्या फायद्याची ठरली आहे. टोल फ्री क्रमांकाच्या पाट्या गायबफसवणूक झाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. तशी पाटी दुकानात लावण्याची सूचना आहेत. मात्र विके्रत्यांनी या पाट्या काढून ठेवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तक्रार नोंदविता येत नाही. बियाणे विक्रीचा परवाना दुकानात ठेवण्याच्या सूचना आहे. परवानाप्राप्त बियाण्यांची यादी आणि महत्वाचे दस्तावेज त्यासाठी आवश्यक आहे. असे असले तरी, ही गंभीर बाब विक्रेते दडवितात. परवाना नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारतात.