शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

रॅक पॉर्इंट अद्याप कागदावरच

By admin | Updated: April 26, 2015 00:01 IST

तालुक्यातील कायर येथे गेल्या पाच वर्षांपूर्वी खत उतरविण्यासाठी रॅक पॉर्इंट मंजूर झाल्याची आवई उठविण्यात आली होती.

आश्वासन हवेतच : खरीप हंगामापूर्वी पॉर्इंट होण्याची शक्यता मावळलीरवींद्र चांदेकर वणीतालुक्यातील कायर येथे गेल्या पाच वर्षांपूर्वी खत उतरविण्यासाठी रॅक पॉर्इंट मंजूर झाल्याची आवई उठविण्यात आली होती. मात्र अद्याप हा रॅक पॉर्इंट कागदावरच दिसून येत आहे. प्रत्यक्षात अद्याप तेथे खत उतरलेच नाही.वणी, झरी, मारेगाव, पांढरकवडा, राळेगाव आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रबी हंगामात मोठ्या प्रमाणात खत लागते. हे खत त्यांना आपापल्या तालुक्यातील खत विक्रेत्यांकडून घ्यावे लागते. या सर्व तालुक्यातील खत विक्रेते धामणगाव आणि चंद्रपूर येथील रॅक पॉर्इंटवरून खत उचलतात. तेच खत शेतकऱ्यांना पोहोचविले जाते. मात्र धामणगाव आणि चंद्रपूर येथून खत आणण्यासाठी खत विक्रेत्यांना जादा पैसे मोजावे लागतात. शेवटी त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांवरच बसतो. परिणामी शेतकऱ्यांना महागड्या दराने खते खरेदी करावी लागतात. शेतकऱ्यांना खतासाठी जादा पैसे मोजावे लागू नये म्हणून वणी तालुक्यातील कायर येथे रॅक पॉर्इंट देण्याची मागणी होती. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपूर्वीच कायर येथे रॅक पॉर्इंट मंजूर झाल्याची घोणा तत्कालीन खासदार आणि विद्यमान केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली होती. थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कायरचा रॅक पॉर्इंट मंजूर झाल्याचे सांगितले होते. मात्र पाच वर्षे लोटूनही हा रॅक पॉर्इंट अद्याप कागदावरच दिसत आहे. काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही रॅक पॉर्इंट मंजूर झाल्याचे सांगत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोनही पदाधिकाऱ्यांची ती घोषणा अद्याप फसवी ठरली आहे.कायर येथे रेल्वे स्थानक आहे. तेथे सिमटेंचा पॉर्इंटही आहे. याच स्टेशनवरून रेल्वे वॅगनमध्ये सिमेंट भरून ते इतरत्र पाठविले जाते. मात्र अद्याप तेथे खताचा रॅक पॉर्इंट होऊ शकला नाही. त्यासाठी तेथे गोदाम नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. पाच वर्षांपूर्वी रॅक पॉर्इंटची घोषण होताच अधिकाऱ्यांनी कायर रेल्वे स्टेशनची पाहणी केली होती. मात्र त्यानंतर पुढे काय झाले, हे अद्यापही कुणालाच काही कळले नाही. अजून कायरला रॅक पॉर्इंट झालाच नाही, हे मात्र वास्तव आहे. कायर येथे रॅक पॉर्इंट झाल्यास वणीसह झरी, मारेगाव, राळेगाव, पांढरकवडा, घाटंजी आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना खत उपलब्ध होणार आहे. खत विक्रेत्यांना चंद्रपूर अथवा धामणगाव येथून खत आणण्यासाठी करावा लागणारा खर्च कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना वाजवी दरात खत मिळू शकणार आहे. त्यासाठी कायरला रॅक पॉर्इंट होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न होण्याची गरज आहे. केवळ प्रसिद्धी अथवा श्रेय लाटण्यासाठी शेतकऱ्यांना झुलवत ठेवून रॅक पॉर्इंटची आवई उठविण्यापेक्षा प्रत्यक्षात तो सुरू करण्यासाठी खरीप हंगामापूर्वी प्रयत्न होण्याची गरज आहे.खते राज्यमंत्र्यांकडून अपेक्षा वाढल्याया रॅक पॉर्इंटसाठी विद्यमान केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर सुरूवातीपासून प्रयत्नरत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत केंद्रात आणि राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. केंद्र व राज्य सरकार कायर रॅक पॉर्इंटबाबबत उदासीन असल्याचा घोषा अहीर यांनी लावला होता. विरोधी सरकार असल्याने रॅक पॉईट लोंबकळत पडल्याचे ते सांगत होते. मात्र आता केंद्रात आणि राज्यातही भाजपाप्रणीत सरकार आहे. त्यामुळे यावर्षी तरी किमान खरीप हंगामापूर्वी त्यांनी कायर रॅक पॉर्इंट अस्तित्वात आण्यासाठी प्रयत्न करावे, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडेच आता खर राज्यमंत्री पदाचा कार्यभार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र यावर्षीही कायर रॅक पॉर्इंट सुरू न झाल्यास पदाधिकाऱ्यांची आश्वासने हवेतच विरण्याची शक्यता आहे.