शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

रबीची पेरणी संकटात

By admin | Updated: October 28, 2014 23:09 IST

ढगाळ वातावरणामुळे वणी तालुक्यात रबीची पेरणी रखडली आहे. पेरणी रखडल्याने रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता बळावली आहे.

नांदेपेरा : ढगाळ वातावरणामुळे वणी तालुक्यात रबीची पेरणी रखडली आहे. पेरणी रखडल्याने रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता बळावली आहे.सध्या ढगाळ वातावरण कायम आहे. त्यातच पाऊसही येत आहे. त्यामुळे खरीपातील कपाशीवर मावा-तुडतुडे, पांढऱ्या माशीने हल्ला केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव महागडी औषधी घेऊन पिके वाचवण्याकरिता फवारणी करावी लागत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे़ यापूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीत ओलावा नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत हरभरा, गहू, जवस आदी रबी पिकांची पेरणी केली नाही.रबी हंगाम आता लांबणार आहे. पेरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ त्यामुळे रबी पिकाची पेरणी पूर्णपणे रखडली आहे़ ढगाळ वातावरणामुळे आता तरी पाऊस येईल, या आशेने काही शेतकऱ्यांनी जमीन पेरणीकरिता तयार करून ठेवली होती़ परंतु रिपरीप पावसामुळे उलट खरीप पिके दयनीय होत आहेत. सोबतच पीक विषाणूजन्य होत आहे़ त्यामुळे आॅक्टोबर महिना संपत आला तरी रबी पिकांची पेरणी झाली नाही़ परिणामी बळीराजा पुन्हा चिंतेत सापडला आहे़ वणी तालुक्यात गेल्या चार दिसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे़ या वातावरणामुळे सूर्य दर्शनही दुर्लभ झाले नाही़ वातावरणात थंडावा निर्माण झाल्याचा अनुभव येत आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये निरूत्साही परिस्थिती दिसून येत आहे. या वातावरणामुळे आजारातही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. खरीप पिक संकटात असताना किमान रबी पिकापासून तरी लाभ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती़ मात्र रबी पिकही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (वार्ताहर)