शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

रबीची पेरणी संकटात

By admin | Updated: October 28, 2014 23:09 IST

ढगाळ वातावरणामुळे वणी तालुक्यात रबीची पेरणी रखडली आहे. पेरणी रखडल्याने रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता बळावली आहे.

नांदेपेरा : ढगाळ वातावरणामुळे वणी तालुक्यात रबीची पेरणी रखडली आहे. पेरणी रखडल्याने रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता बळावली आहे.सध्या ढगाळ वातावरण कायम आहे. त्यातच पाऊसही येत आहे. त्यामुळे खरीपातील कपाशीवर मावा-तुडतुडे, पांढऱ्या माशीने हल्ला केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव महागडी औषधी घेऊन पिके वाचवण्याकरिता फवारणी करावी लागत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे़ यापूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीत ओलावा नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत हरभरा, गहू, जवस आदी रबी पिकांची पेरणी केली नाही.रबी हंगाम आता लांबणार आहे. पेरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ त्यामुळे रबी पिकाची पेरणी पूर्णपणे रखडली आहे़ ढगाळ वातावरणामुळे आता तरी पाऊस येईल, या आशेने काही शेतकऱ्यांनी जमीन पेरणीकरिता तयार करून ठेवली होती़ परंतु रिपरीप पावसामुळे उलट खरीप पिके दयनीय होत आहेत. सोबतच पीक विषाणूजन्य होत आहे़ त्यामुळे आॅक्टोबर महिना संपत आला तरी रबी पिकांची पेरणी झाली नाही़ परिणामी बळीराजा पुन्हा चिंतेत सापडला आहे़ वणी तालुक्यात गेल्या चार दिसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे़ या वातावरणामुळे सूर्य दर्शनही दुर्लभ झाले नाही़ वातावरणात थंडावा निर्माण झाल्याचा अनुभव येत आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये निरूत्साही परिस्थिती दिसून येत आहे. या वातावरणामुळे आजारातही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. खरीप पिक संकटात असताना किमान रबी पिकापासून तरी लाभ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती़ मात्र रबी पिकही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (वार्ताहर)