शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रबी लागवडही अधांतरी

By admin | Updated: November 17, 2014 23:02 IST

ज्या पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती, त्याच नगदी आणि प्रमुख पिकांनी यावर्षी दगा दिल्याचे सुधारीत आणेवारी घोषित झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामाने दगा दिल्याने

पुसद : ज्या पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती, त्याच नगदी आणि प्रमुख पिकांनी यावर्षी दगा दिल्याचे सुधारीत आणेवारी घोषित झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामाने दगा दिल्याने रबीच्या लागवडीचीसुद्धा सोय आता उरली नाही. आधीच्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँका पुन्हा कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक खाईत गुरफटल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी सोयाबीनकडे पुसद परिसरातील शेतकऱ्यांचा कल गेल्या काही वर्षात वाढला होता. परंतु खरिप पिकाच्या सुधारीत आणेवारीने भयावह वास्तव उघडे पाडले. यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने पीक परिस्थिती नाजूक झाली. थोड्याफार प्रमाणात का होईना, शेतकऱ्यांना हातभार मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली आहे. शासनाकडून आता किती व कधी मदत मिळते, कोणत्या सोयी-सुविधा मिळतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे आणि यावरच शेतकऱ्यांचे पुढिल नियोजन अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे दिसून येत आहे. अतिशय परिश्रमाने खरीपपूर्व मशागत शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर लागवड, दुबार व तिबार पेरणीचे संकट सारे काही सोसल्यानंतरही हाती मात्र काहीच लागले नाही. मृग पावसाची प्रतिक्षा केली, परंतू रिमझिम, संततधार पावसाच्या हजेरीने पिकांची उगवण, वाढ, पोषण यावर परिणाम झाला. पिकांची हानी झाली, चारा तयार झाला नाही. पिकाला पोषक वातावरण भेटलेच नाही. पर्यायाने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. पुसद कृषी उपविभागात सोयाबीनचा पेरा १ लाख ९३३ हेक्टर झाला. पुसद तालुक्यामध्ये ३३ हजार ६६ हेक्टरवर पेरणी झाली. दिग्रसमध्ये १३ हजार ८३० हेक्टर, उमरखेडमध्ये ३२ हजार ९८० आणि महागांवमध्ये २० हजार ६४७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. पुसद तालुक्यात भयावह चित्र आहे. पाणी, चारा, रोजगार आदी प्रश्नांनी नागरिकांची झोप उडाली आहे. शेतकऱ्यांचा खर्च खरीप पिकांतून निघाला नाही. नजरअंदाज आणेवारीवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर सुधारीत आणेवारी ४२ पैसे काढण्यात आली. १०० टक्के उत्पन्नाच्या जागी शेतीतून केवळ ४२ टक्के उत्पन्न झाल्याचे शासानाकडून अधिकृत सांगण्यात आले आहे. शेतीच्या बांधावर चित्र काही औरच आहे, अडीच क्विंटल बियाण्याला केवळ दोन क्विंटल उत्पादन निघाले आहे. पेरणी इतकेही उत्पादन मिळाले नाही. त्यात नंतरचा काढणीचा खर्च १५०० रुपये एकरी व मळणीयंत्रासाठी ३०० रुपये पोते मोजावे लागल्याने शेतकऱ्यांनी निघालेले सोयाबीन काढणीवाल्यांनाच दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. येणाऱ्या हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जावे लागत आहे. जशी पिकांची स्थिती तशीच पाणी आणि चाऱ्याचीही टंचाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अधांतरी आहे. शासनाकडून काढलेल्या सुधारीत आणेवारीहून डिसेंबर अखेरपर्यंत अंतीम आणेवारी ही ५० टक्केच्या आतच येण्याची दाट शक्यता आहे. पुसद उपविभागात दुष्काळस्थिती असल्याने संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. दुष्काळातून सावरण्यासाठी शासनस्तरावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)