शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

बाणगाव प्रकल्पाच्या कामावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: July 3, 2017 02:07 IST

येथील लघु प्रकल्पाची केवळ भिंत बांधून धरणाचे सोपस्कार पार पाडल्याचे भासविले जात आहे.

नागरिकात भीती : कामात हलगर्जीपणाचा अभियंत्यावर आरोपनीलेश राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कबाणगाव : येथील लघु प्रकल्पाची केवळ भिंत बांधून धरणाचे सोपस्कार पार पाडल्याचे भासविले जात आहे. धरणात गेलेली जमीन जैसे थे असताना पाणी साठवणूक होणार अशी, असा प्रश्न जानकार नागरिकांना पडला आहे. त्यामुळे या लघु प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र आहे.बाणगाव परिसरात पाण्याची नेहमीच टंचाई भासत असल्याने या परिसरात धरणाची संकल्पना आणली. त्यानुसार जमिनीची लेव्हल तपासण्याचे काम अभियंत्यांच्या मदतीने करण्यात आले. हे काम जवळपास दहा वर्षांपासून सुरू होते. येथे दोन टीएमसी पाणीसाठवण क्षमतेचे धरण निर्मितीचे काम सुरू झाले. संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या. आज तारखेला या धरणाच्या भिंतीचे काम पूर्णत्वास गेले असल्याचे सांगितले जाते. मात्र काही चिकित्सक लोकांनी पाहणी केली असता धरणात व्यापलेली जमीन जैसे थेच असल्याचे दिसून आले. त्यामुळे धरण म्हटल्यास त्याचे काही निकष येथे पूर्ण झाले काय, हे पाहणी अंती संबंधित शाखा अभियंत्यांना याबाबत विचारले असता सपाटीकरणावर ते निरूत्तर राहिले. त्यामुळे या धरणाचे काम एकंदरित निकृष्ट झाल्याचे उघड होत आहे. धरणाचे काम अगदी काटेकोर असणे अनिवार्य आहे. कारण त्यातील थोडीही चूक हजारो नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे सपाटीकरणाचे काम काटेकोर होणे गरजेचे आहे. येथे बांधण्यात आलेल्या धरणासाठी अधिग्रहित केलेली जमीन अगदी पूर्वी होती तशीच आहे. अनेक झाडे कायम आहे. पठारी भाग एक समान करण्यात आलेला नाही. त्यामुळे या धरणाची साठवण क्षमता दोन टीएमसी कशी राहील, हाही प्रश्नच आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जमीन सपाटीचे काम होणे नाही. जमा झालेले पाणी साठवण क्षमतेपेक्षा अधिक झाल्यास गावात शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.