शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे शेतमाल वाहतुकीचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

खरिपाची पिके घरात येतानाची वेळ असतानाच जोरदार पाऊस झाला. सोयाबीन मातीमोल झाले. जे काही हाती लागले त्याला बाजारात भाव मिळाला नाही. काहींचा लागवड खर्चही निघाला नाही. यातून सावरण्याचा प्रयत्न म्हणून खरिपाची पिके घेतली. गहू, हरभरा यासोबतच जोडीला भाजीपाला लावण्यात आला. गेली काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारा सुरू आहे.

ठळक मुद्देभाजीपाला सडतोय : कवडीमोल दरात विक्री, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : संकटाच्या मालिकेला तोंड देता देता शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. अस्मानी, सुलतानी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता कोरोनाचा विळखा पडला आहे. हे संकट कमी की काय, म्हणून नैसर्गिक आपत्ती त्यात भर घालत आहे. खरिपाची पिके आणि भाजीपाला यावर संपूर्ण वर्षभराची मदार आहे. मात्र अवकाळी पाऊस, संचारबंदीमुळे माल वाहतुकीत येणारे अडथळे यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.खरिपाची पिके घरात येतानाची वेळ असतानाच जोरदार पाऊस झाला. सोयाबीन मातीमोल झाले. जे काही हाती लागले त्याला बाजारात भाव मिळाला नाही. काहींचा लागवड खर्चही निघाला नाही. यातून सावरण्याचा प्रयत्न म्हणून खरिपाची पिके घेतली. गहू, हरभरा यासोबतच जोडीला भाजीपाला लावण्यात आला. गेली काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारा सुरू आहे. यामध्ये वाळलेला गहू झोपला. काहींची गहू काढण्याची तयारी सुरू असतानाच पावसाने त्यावर पाणी फेरले. हरभऱ्याचीही माती झाली. शेतात असलेला भाजीपालाही सडण्याच्या मार्गावर आला. पालक, सांभार, चवळी, घोळ या भाज्या हाती लागल्या नाही. टमाटे, भेंडी, चवळीच्या शेंगा, कारले आदी भाज्या काही ठिकाणी खराब झाल्या. राहिलेला माल बाजारात विकून पैसा करण्याचा मनसूबा असतानाच कोरोनामुळे अडथळे निर्माण होत आहे. शेतातून तोडलेला माल शहरात विकण्यासाठी नेत असतानाच टाळेबंदीचा सामना करावा लागत आहे. मार्गात जागोजागी होणारी चौकशी, चौकशी करणाऱ्यांचे समाधान झाले नाही तर दंडुके याबाबींना तोंड द्यावे लागत आहे. कसाबसा मंडईत गेलेला माल अतिशय कमी दराने विकावा लागत आहे. कधीकधी तर वाहतूक खर्चही निघत नाही. शेतातील भाजीपाला तोडण्यासाठी मजूर वर्ग उपलब्ध होत नाही. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले. जणू त्यांच्या विकासालाच टाळे लागल्याचे चित्र आहे.टरबूजाचा दर तीन रुपये किलोटरबूज ठोक भावात केवळ तीन रुपये किलो दराने विकावे लागत आहे. युवा शेतकऱ्यांच्या प्रयत्नावर यामुळे पाणी फेरले जात आहे. तालुक्यात जवळपास ४० युवकांनी टरबुजाची शेती केली आहे. लॉकडाऊनमुळे तुरीच्या खरेदीलाही सुरुवात झाली नाही. केवळ आॅनलाईन नोंदणी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहे.

टॅग्स :agricultureशेती