शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

पात्रता परीक्षेत केवळ तीन टक्के शिक्षक उत्तीर्ण

By admin | Updated: June 28, 2014 23:48 IST

डी.एड. पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्र मिळविणे शासनाने बंधनकारक केले. केवळ तीन प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. नुकताच परीक्षेचा निकाल लागला

यवतमाळ : डी.एड. पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्र मिळविणे शासनाने बंधनकारक केले. केवळ तीन प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. नुकताच परीक्षेचा निकाल लागला असून केवळ तीन टक्के शिक्षक पात्र ठरले आहे. जिल्ह्यातून टीईटीच्या परीक्षेसाठी २७ हजार डी.एड. पात्रताधारक बसले होते. मात्र यापैकी केवळ ८७४ उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी डी.एड.धारकांचा चांगलाच कस लागत आहे. शिक्षक होण्यासाठी पात्रता परीक्षेचा अडथळा पार करताना अनेकांची दमछाक होणार आहे. आज डी.एड. प्रवेशाकडे कोणीच फिरकताना दिसत नाही. पूर्वी हमखास नोकरीचे क्षेत्र म्हणून डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला जात होता. डी.एड. पात्रताधारकांची कधीकाळी चांगलीच डिमांड होती. मात्र आता जिल्हा परिषद शाळांना घरघर लागल्याने पदभरतीच केली जात नाही. अशा स्थितीत राज्य शासनाने डी.एड. धारकांसाठी शिक्षक पात्रता प्रमाणपत्र बंधनकारक केले. यासाठी परीक्षा घेण्यात आली. बेरोजगार असलेल्या अनेक डी.एड.धारकांनी मोठ्या संख्येने ही परीक्षा दिली. मात्र अतिशय कठीण असलेल्या या परीक्षेत केवळ ८७४ जण उत्तीर्ण झाले आहे. त्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिक्षक पात्रतेचे प्रमाणपत्र दिले जात आहे. पहिल्या पेपरमध्ये ५२९ तर दुसऱ्या पेपरमध्ये ३४५ जण पात्रता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले आहे. यापैकी २५७ जणांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले असून ६१७ जणांचे प्रमाणपत्र अद्यापही शिक्षण विभागातच आहे.पहिल्यांदाच टीईटी परीक्षा झाल्यामुळे अनेकांना अभ्यासाचा अंदाज आला नाही. त्यामुळे निकाल घसरल्याचे सांगितले जाते. शासनाकडून ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी तीन वेळा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता होणाऱ्या टीईटी परीक्षेत निकालाची टक्केवारी उंचावेल, अशी आशा शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. पात्रता परीक्षा देवून प्रमाणपत्र मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी म्हणून ताटकळत राहावे लागणार आहे. सध्या तरी जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत. अनेक शाळांमध्ये पटसंख्या रोडावल्याने तेथील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. या शिक्षकांनाच शासनाने पटसंख्येची अट शिथील करून दिलासा दिला आहे. अशा स्थितीत नव्याने भरती करणे शक्य नसल्याचेही सांगण्यात येते. (कार्यालय प्रतिनिधी)