शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पात्रता परीक्षेत केवळ तीन टक्के शिक्षक उत्तीर्ण

By admin | Updated: June 28, 2014 23:48 IST

डी.एड. पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्र मिळविणे शासनाने बंधनकारक केले. केवळ तीन प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. नुकताच परीक्षेचा निकाल लागला

यवतमाळ : डी.एड. पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्र मिळविणे शासनाने बंधनकारक केले. केवळ तीन प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. नुकताच परीक्षेचा निकाल लागला असून केवळ तीन टक्के शिक्षक पात्र ठरले आहे. जिल्ह्यातून टीईटीच्या परीक्षेसाठी २७ हजार डी.एड. पात्रताधारक बसले होते. मात्र यापैकी केवळ ८७४ उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी डी.एड.धारकांचा चांगलाच कस लागत आहे. शिक्षक होण्यासाठी पात्रता परीक्षेचा अडथळा पार करताना अनेकांची दमछाक होणार आहे. आज डी.एड. प्रवेशाकडे कोणीच फिरकताना दिसत नाही. पूर्वी हमखास नोकरीचे क्षेत्र म्हणून डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला जात होता. डी.एड. पात्रताधारकांची कधीकाळी चांगलीच डिमांड होती. मात्र आता जिल्हा परिषद शाळांना घरघर लागल्याने पदभरतीच केली जात नाही. अशा स्थितीत राज्य शासनाने डी.एड. धारकांसाठी शिक्षक पात्रता प्रमाणपत्र बंधनकारक केले. यासाठी परीक्षा घेण्यात आली. बेरोजगार असलेल्या अनेक डी.एड.धारकांनी मोठ्या संख्येने ही परीक्षा दिली. मात्र अतिशय कठीण असलेल्या या परीक्षेत केवळ ८७४ जण उत्तीर्ण झाले आहे. त्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिक्षक पात्रतेचे प्रमाणपत्र दिले जात आहे. पहिल्या पेपरमध्ये ५२९ तर दुसऱ्या पेपरमध्ये ३४५ जण पात्रता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले आहे. यापैकी २५७ जणांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले असून ६१७ जणांचे प्रमाणपत्र अद्यापही शिक्षण विभागातच आहे.पहिल्यांदाच टीईटी परीक्षा झाल्यामुळे अनेकांना अभ्यासाचा अंदाज आला नाही. त्यामुळे निकाल घसरल्याचे सांगितले जाते. शासनाकडून ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी तीन वेळा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता होणाऱ्या टीईटी परीक्षेत निकालाची टक्केवारी उंचावेल, अशी आशा शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. पात्रता परीक्षा देवून प्रमाणपत्र मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी म्हणून ताटकळत राहावे लागणार आहे. सध्या तरी जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत. अनेक शाळांमध्ये पटसंख्या रोडावल्याने तेथील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. या शिक्षकांनाच शासनाने पटसंख्येची अट शिथील करून दिलासा दिला आहे. अशा स्थितीत नव्याने भरती करणे शक्य नसल्याचेही सांगण्यात येते. (कार्यालय प्रतिनिधी)