शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

मनाच्या निर्मलतेने समाजाची प्रगती

By admin | Updated: May 24, 2016 00:14 IST

मनामध्ये बदल कसा घडविता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. माणसाचे मन अनेक विकारांनी जर्जर झालेले आहे.

मुनिश्री प्रतिकसागर महाराज : सर्वधर्म सत्संग महोत्सव यवतमाळ : मनामध्ये बदल कसा घडविता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. माणसाचे मन अनेक विकारांनी जर्जर झालेले आहे. त्यामध्ये बदल घडविणे काळाची गरज आहे. मनात निर्मलता निर्माण झाली तर आपोआपच समाजाची प्रगती होऊ शकते, असे विचार मुनिश्री प्रतिकसागर महाराज यांनी मांडले. येथील केसरिया भवनात आयोजित सर्वधर्म सत्संग महोत्सवात ते मार्गदर्शन करत होते. मुनिश्री प्रतिकसागर महाराज पुढे म्हणाले, मंदिरात बसून व्यापार करावयास लागलेल्या व्यक्तीच्या मनाची अवस्था बदलण्याची अवश्यकता आहे. शेवटी चांगले काय आणि वाईट काय, ही ठरविण्याची ताकद तुमच्या मनामध्ये आहे. परिवर्तन मनुष्याने स्वत: केले पाहिजे, तरच त्याच्या मनामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. वाईट विचारांना, वाईट प्रवृत्तींना आपण मनाच्या कप्प्यामध्ये बंद करून ठेवले तर ही गोष्ट तुमच्या चारित्र्यामध्येसुद्धा स्पष्ट दिसायला लागेल यात शंका नाही, असे ते म्हणाले. माणसात निर्माण झालेल्या अहंकाराविषयी विविध उदाहरणे देत त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्वात मोठा कोण, या प्रश्नाची उत्तरे पैशाने माणूस मोठा होतो, पैशाने माणसाची ओळख होते, पैशाशिवाय माणसाला विचारत नाही, अशी दिली जातात. तर कोणी सत्ताही माणसाला ओळख देते, सत्तेशिवाय माणसाची ओळख होत नाही, सत्ता सर्वश्रेष्ठ आहे, असे सांगितले जाते. हीच ओळख आज समाजामध्ये दिली जाते. ही ओळख देताना माणूस अहंकार अंगिकारत आहे. यात तो लहान्याला प्रेम आणि मोठ्याला सन्मान देणे विसरून गेला आहे. मोठा कोण आणि त्या मोठेपणामध्ये अर्थ काय, असा प्रश्नही मुनिश्रींनी यावेळी उपस्थित केला.माणसाला अहंकाराने नष्ट केले आहे. रक्ताच्या नात्यात दरी निर्माण झाली आहे. बाहेरच्या व्यक्तींना जवळ केले जात आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक असल्याचे मुनिश्री म्हणाले. (वार्ताहर)