शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

मनाच्या निर्मलतेने समाजाची प्रगती

By admin | Updated: May 24, 2016 00:14 IST

मनामध्ये बदल कसा घडविता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. माणसाचे मन अनेक विकारांनी जर्जर झालेले आहे.

मुनिश्री प्रतिकसागर महाराज : सर्वधर्म सत्संग महोत्सव यवतमाळ : मनामध्ये बदल कसा घडविता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. माणसाचे मन अनेक विकारांनी जर्जर झालेले आहे. त्यामध्ये बदल घडविणे काळाची गरज आहे. मनात निर्मलता निर्माण झाली तर आपोआपच समाजाची प्रगती होऊ शकते, असे विचार मुनिश्री प्रतिकसागर महाराज यांनी मांडले. येथील केसरिया भवनात आयोजित सर्वधर्म सत्संग महोत्सवात ते मार्गदर्शन करत होते. मुनिश्री प्रतिकसागर महाराज पुढे म्हणाले, मंदिरात बसून व्यापार करावयास लागलेल्या व्यक्तीच्या मनाची अवस्था बदलण्याची अवश्यकता आहे. शेवटी चांगले काय आणि वाईट काय, ही ठरविण्याची ताकद तुमच्या मनामध्ये आहे. परिवर्तन मनुष्याने स्वत: केले पाहिजे, तरच त्याच्या मनामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. वाईट विचारांना, वाईट प्रवृत्तींना आपण मनाच्या कप्प्यामध्ये बंद करून ठेवले तर ही गोष्ट तुमच्या चारित्र्यामध्येसुद्धा स्पष्ट दिसायला लागेल यात शंका नाही, असे ते म्हणाले. माणसात निर्माण झालेल्या अहंकाराविषयी विविध उदाहरणे देत त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्वात मोठा कोण, या प्रश्नाची उत्तरे पैशाने माणूस मोठा होतो, पैशाने माणसाची ओळख होते, पैशाशिवाय माणसाला विचारत नाही, अशी दिली जातात. तर कोणी सत्ताही माणसाला ओळख देते, सत्तेशिवाय माणसाची ओळख होत नाही, सत्ता सर्वश्रेष्ठ आहे, असे सांगितले जाते. हीच ओळख आज समाजामध्ये दिली जाते. ही ओळख देताना माणूस अहंकार अंगिकारत आहे. यात तो लहान्याला प्रेम आणि मोठ्याला सन्मान देणे विसरून गेला आहे. मोठा कोण आणि त्या मोठेपणामध्ये अर्थ काय, असा प्रश्नही मुनिश्रींनी यावेळी उपस्थित केला.माणसाला अहंकाराने नष्ट केले आहे. रक्ताच्या नात्यात दरी निर्माण झाली आहे. बाहेरच्या व्यक्तींना जवळ केले जात आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक असल्याचे मुनिश्री म्हणाले. (वार्ताहर)