शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

पाणीटंचाई क्षेत्रातील नद्या पुनर्जीवन कामांना प्राधान्य

By admin | Updated: December 10, 2015 02:41 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोक सहभागाद्वारे राबविण्यात येत असलेले नदी पुनर्जीवन कार्यक्रम प्रामुख्याने पाणटंचाई असलेल्या क्षेत्रात...

टंचाईमुक्त महाराष्ट्र : जनजागृती सनियंत्रण व पारदर्शकतेवर भरयवतमाळ : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोक सहभागाद्वारे राबविण्यात येत असलेले नदी पुनर्जीवन कार्यक्रम प्रामुख्याने पाणटंचाई असलेल्या क्षेत्रात अथवा अवर्षण प्रवण क्षेत्रात राबविण्यात यावे, असे निर्देश जलसंधारण विभागाने दिले आहेत. सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र अंतर्गत टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. याद्वारा पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारात अडविणे, विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करणे, जुन्या बंद पडलेल्या योजनांचे पुनर्जीवन, अस्तित्वातील जलस्त्रोतातून लोकसहभागातून गाळ काढून जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या ताळेबंदाबाबत जाणीव जागृती निर्माण करणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्र वाढविणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या कार्यक्षम वापरात वाढ करणे, लोकसहभाग वाढविणे आदी बाबी या अभियानात अपेक्षित आहे. यासाठी पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण व रुंदीकरण, जुन्या संरचनाचे पुनर्जीवन करणे, पाझर तलावांची दुरूस्ती, विहीर, बोअरवेल पुनर्भरण कालवा दुरूस्ती आदी कामे अभियानाअंतर्गत सुरू आहेत. नद्या, ओढे व नाले यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामामध्ये जनतेची चळवळ निर्माण झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. हा कार्यक्रम यापुढे अधिक प्रभावी राबविण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जलसंधारण विभागाने प्रत्येक जिल्ह्याला दिल्या आहेत. त्यानुसार पाणीटंचाई असलेल्या क्षेत्रात नदी पुनर्जीवनाची कामे प्राधान्याने घेण्यात येणार आहेत. सबंधित गावामध्ये ग्रामसभा घेऊन लोकसहभागातून करावयाच्या कामांसाठी मान्यता घेण्यात येईल. लोकसहभागातून नदी, ओढे, नाला पात्रातील गाळ काढणे, अतिक्रमण काढून खोलीकरण व रुंदीकरण करणे, वृक्षलागवड, जनजागृती पर्यवेक्षण इत्यादींमध्ये लोकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. खोलीकरण व रुंदीकरण करताना शासन निर्णयाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. खोलीकरण, रूंदीकरण करताना आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)