शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डिजिटल शाळांवर वीज कपातीचे संकट

By admin | Updated: February 27, 2017 00:53 IST

विद्यार्थीभिमूख अध्यापन पद्धती राबविण्यासाठी जिल्हाभरात डिजीटल शाळा साकारण्यात आल्या.

महावितरणची वसुली मोहीम : बिलासाठी आर्थिक तरतूद नाही यवतमाळ : विद्यार्थीभिमूख अध्यापन पद्धती राबविण्यासाठी जिल्हाभरात डिजीटल शाळा साकारण्यात आल्या. मात्र डिजीटल साधने वापरण्यासाठी अनेक शाळांमध्ये सुरळीत वीज पुरवठा मिळत नाही. अनेक शाळांकडे हजारो रुपयांचे वीज बिल थकित असल्यामुळे सध्या महाविरणच्या कर्मचाऱ्यांनी शाळांची वीज जोडणी कापण्याचा सपाटा लावला आहे. मार्च एंडिंग नजरेपुढे ठेऊन महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांकडे तब्बल १०-१० हजार रुपयांचे बिल थकित आहे. काही शाळांनी सादिलमधून हा खर्च भागविण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश शाळांचे बिल सादिलपेक्षाही ज्यादा आहे. विशेष म्हणजे जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावरही शाळांच्या वीज बिलाच्या फेडीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद केली जात नाही. महावितरणने शाळांना दिलेले वीज मिटर हे वाणिज्यीक वापर (सीएल) या प्रकारातील आहे. त्यामुळे दर महिन्याला वापरापेक्षा अधिक बिल येत आहे. प्रत्येक शाळेला घरगुती वापर (डीएल) प्रकारातील वीज मिटर बसवून मिळावे, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. परंतु त्याकडे शिक्षण विभाग आणि महावितरण या दोन्ही पातळीवर दुर्लक्ष सुरू आहे. सध्या उन्हाळा तापत असल्याने शाळांमध्ये विजेची गरज आहे. शिवाय डिजीटल पद्धतीने अध्यापन करण्यासाठी प्रोजेक्टर, संगणक अशी विविध साधने विजेविना वापरणे अशक्य होत आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीत नव्या पद्धतीचे अध्यापन करता येत नसल्याने अनेक शाळांमधील डिजीटल वर्ग खोल्या केवळ शोभेपुरत्या उरणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तिवसा केंद्रातील उमरठा, दिघोरी, वरुड, इजारा, तिवसा येथील शाळांचे बिल थकल्याने वीज पुरवठा कापण्यात आला. बिलासाठी जिल्हा परिषदेने आर्थिक तरतूद करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर काठोळेंनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)