शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

गरिबांचे पैसे पाण्यात

By admin | Updated: September 4, 2015 02:28 IST

निढळाचा घाम गाळून दोन वेळच्या जेवणाची सोय करणाऱ्यांना सध्या अर्धी कमाई शुद्ध पाण्यासाठी खर्च करावी लागत आहे.

स्पर्धा ‘टार्गेट’ची : थोपविले जात आहे महागडे यंत्रयवतमाळ : निढळाचा घाम गाळून दोन वेळच्या जेवणाची सोय करणाऱ्यांना सध्या अर्धी कमाई शुद्ध पाण्यासाठी खर्च करावी लागत आहे. अशुद्ध पाण्यातून विविध आजार वाढत आहे. याच संधीचे सोने करीत वॉटर फिल्टर विक्रेत्यांकडून महागडी उपकरणे गरिबांच्या माथी मारली जात आहे.शहरात जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी, तो बऱ्याच भागात एक दिवसाआड होतो. ही बाब टाळण्यासाठी अनेकांनी आपल्या अंगणात बोअरवेल केली आहे. अशा प्रत्येक घरी महागडे वॉटर फिल्टर बसविले गेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते योग्यही आहे. परंतु, मुळात शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना नागरिकांना महागडे यंत्र खरेदी करावे लागत आहे. श्रीमंतांना ही हौस परवडते. परंतु, आता गरिबांना गरज आणि ऐपत नसतानाही हा खर्च करावा लागत आहे.विविध कंपन्यांचे वॉटर फिल्टर यंत्र विकण्यासाठी शहरात स्पर्धाच सुरू झाली आहे. ग्राहक वाढविण्यासाठी विक्रेत्यांनी एजंट नेमले असून हे एजंट ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी शहर पिंजून काढत आहेत. दुसऱ्या एजंटच्या तुलनेत आपली कामगिरी उजवी ठरावी यासाठी आता ज्यांची ऐपत नाही, अशाही कुटुंबांमध्ये जाऊन वॉटर फिल्टर माथी मारले जात आहेत. दोन वेळच्या जेवणासाठी आॅटोरिक्षा चालविणे, बांधकाम मजूर म्हणून राबणे, शेतमजुरीला जाणे अशी कामे करणाऱ्या गरीब नागरिकांनाही चक्क १५ हजार रुपयांचे जलशुद्धीकरण यंत्र विकले जात आहे. यात अप्रत्यक्षपणे जबरदस्तीच केली जाते. हे एजंट एकाच गरीब ग्राहकाच्या घरी दिवसातून दोन वेळा, आठवड्यातून चार वेळा जातात. तरीही ग्राहक न मानल्यास त्याला दररोज फोन केला जातो. तरीही ग्राहक तयार होत नसेल तर त्याला इन्स्टॉलमेंटची योजना दिली जाते. साहजिकच ऐपत नसलेला ग्राहकही या योजनेला भुलतो. १ हजार रुपये नगदी देऊन १५ ते १६ हजार रुपयांचे यंत्र घेतो. दर महिन्याला ६ ते ७ हजार रुपये कमावणारा हा ग्राहक हजार दीड हजार रुपयांची इन्स्टॉलमेंट भरतो. वास्तवात गरीब ग्राहक पाणी केवळ उकळूनही शुद्ध करू शकतो. पण एजंटच्या जबरदस्तीपायी त्यांना दरमहिन्याला हजार दीड हजार खर्च करण्याची वेळ येत आहे. मुळात शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी पालिका, प्राधिकरण, ग्रामपंचायत यांची आहे. मात्र, त्यांच्यावर नागरिकांचा आता विश्वास उरलेला नाही. याचाच गैरफायदा आता विक्रेत्यांनी घेतला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)शुद्ध पाण्यासाठी सोपे उपायपाण्याची शुद्धता राखण्यासाठी १५ ते २० हजारांचा वॉटर फिल्टरच आवश्यक नसतो. काही घरगुती उपाय करूनही पाणी सहज शुद्ध ठेवले जाऊ शकते. साधे उकळून थंड केलेले पाणीही आरोग्याच्या दृष्टीने पुरेसे शुद्ध होते. पाण्यात तुरटीचा तुकडा टाकून ठेवल्यासही शुद्ध पाणी मिळते. शिवाय, औषधी दुकानात अत्यल्प किमतीत मिळणारे जीवनड्रॉप टाकूनही पाणी सहज शुद्ध केले जाऊ शकते. शिवाय दर दोन तीन महिन्यांनी वॉटर फिल्टर दुरुस्त करण्याचा त्रासही यातून टळू शकतो.बिल्डरवर कारवाईची गरजविशेषत: लगतच्या अनेक ग्रामपंचायतींच्या परिसरात कित्येक नव्या वसाहती उभ्या झाल्या आहेत. येथे पाण्याच्या शोधात घरोघरी बोअरवेल केल्या गेल्या आहेत. हे पाणी क्षारयुक्त असल्याने या परिसरावर वॉटर फिल्टर विक्रेत्यांचा डोळा आहे. घरे विकताना बिल्डरने ग्राहकांना शुद्ध पाण्याची हमी दिलेली असते. मात्र, नंतर नागरिकांना वाऱ्यावर सोडले जाते. नव्या वसाहतींमधील नागरिकांना ना प्रशासन शुद्ध पाणी पुरवत ना बिल्डर. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची गरज आहे.गरजेची वस्तू बनली स्टेटस् सिम्बॉलवॉटर फिल्टर ही आरोग्यासाठी गरजेची वस्तू आहे. पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी या यंत्राचा चांगला उपयोग होतो. परंतु, हे यंत्र विकणारे एजंट ग्राहकांच्या घरी जाऊन घरी वॉटर फिल्टर असणे म्हणजे स्टेटस् सिम्बॉल असल्याचे भासवतात. अनेक गृहिणींचाही तसाच समज होतो. त्यातून ऐपतीपेक्षाही जादा किमतीचे यंत्र खरेदी केले जात आहे. हा पूर्णत: वैध व्यवहार असला तरी, विक्रेते व एजंटच्या शाब्दिक भुलभुलैयामुळे गरिबांना गरज नसताना खर्च करावा लागत आहे.