शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचे पैसे पाण्यात

By admin | Updated: September 4, 2015 02:28 IST

निढळाचा घाम गाळून दोन वेळच्या जेवणाची सोय करणाऱ्यांना सध्या अर्धी कमाई शुद्ध पाण्यासाठी खर्च करावी लागत आहे.

स्पर्धा ‘टार्गेट’ची : थोपविले जात आहे महागडे यंत्रयवतमाळ : निढळाचा घाम गाळून दोन वेळच्या जेवणाची सोय करणाऱ्यांना सध्या अर्धी कमाई शुद्ध पाण्यासाठी खर्च करावी लागत आहे. अशुद्ध पाण्यातून विविध आजार वाढत आहे. याच संधीचे सोने करीत वॉटर फिल्टर विक्रेत्यांकडून महागडी उपकरणे गरिबांच्या माथी मारली जात आहे.शहरात जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी, तो बऱ्याच भागात एक दिवसाआड होतो. ही बाब टाळण्यासाठी अनेकांनी आपल्या अंगणात बोअरवेल केली आहे. अशा प्रत्येक घरी महागडे वॉटर फिल्टर बसविले गेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते योग्यही आहे. परंतु, मुळात शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना नागरिकांना महागडे यंत्र खरेदी करावे लागत आहे. श्रीमंतांना ही हौस परवडते. परंतु, आता गरिबांना गरज आणि ऐपत नसतानाही हा खर्च करावा लागत आहे.विविध कंपन्यांचे वॉटर फिल्टर यंत्र विकण्यासाठी शहरात स्पर्धाच सुरू झाली आहे. ग्राहक वाढविण्यासाठी विक्रेत्यांनी एजंट नेमले असून हे एजंट ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी शहर पिंजून काढत आहेत. दुसऱ्या एजंटच्या तुलनेत आपली कामगिरी उजवी ठरावी यासाठी आता ज्यांची ऐपत नाही, अशाही कुटुंबांमध्ये जाऊन वॉटर फिल्टर माथी मारले जात आहेत. दोन वेळच्या जेवणासाठी आॅटोरिक्षा चालविणे, बांधकाम मजूर म्हणून राबणे, शेतमजुरीला जाणे अशी कामे करणाऱ्या गरीब नागरिकांनाही चक्क १५ हजार रुपयांचे जलशुद्धीकरण यंत्र विकले जात आहे. यात अप्रत्यक्षपणे जबरदस्तीच केली जाते. हे एजंट एकाच गरीब ग्राहकाच्या घरी दिवसातून दोन वेळा, आठवड्यातून चार वेळा जातात. तरीही ग्राहक न मानल्यास त्याला दररोज फोन केला जातो. तरीही ग्राहक तयार होत नसेल तर त्याला इन्स्टॉलमेंटची योजना दिली जाते. साहजिकच ऐपत नसलेला ग्राहकही या योजनेला भुलतो. १ हजार रुपये नगदी देऊन १५ ते १६ हजार रुपयांचे यंत्र घेतो. दर महिन्याला ६ ते ७ हजार रुपये कमावणारा हा ग्राहक हजार दीड हजार रुपयांची इन्स्टॉलमेंट भरतो. वास्तवात गरीब ग्राहक पाणी केवळ उकळूनही शुद्ध करू शकतो. पण एजंटच्या जबरदस्तीपायी त्यांना दरमहिन्याला हजार दीड हजार खर्च करण्याची वेळ येत आहे. मुळात शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी पालिका, प्राधिकरण, ग्रामपंचायत यांची आहे. मात्र, त्यांच्यावर नागरिकांचा आता विश्वास उरलेला नाही. याचाच गैरफायदा आता विक्रेत्यांनी घेतला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)शुद्ध पाण्यासाठी सोपे उपायपाण्याची शुद्धता राखण्यासाठी १५ ते २० हजारांचा वॉटर फिल्टरच आवश्यक नसतो. काही घरगुती उपाय करूनही पाणी सहज शुद्ध ठेवले जाऊ शकते. साधे उकळून थंड केलेले पाणीही आरोग्याच्या दृष्टीने पुरेसे शुद्ध होते. पाण्यात तुरटीचा तुकडा टाकून ठेवल्यासही शुद्ध पाणी मिळते. शिवाय, औषधी दुकानात अत्यल्प किमतीत मिळणारे जीवनड्रॉप टाकूनही पाणी सहज शुद्ध केले जाऊ शकते. शिवाय दर दोन तीन महिन्यांनी वॉटर फिल्टर दुरुस्त करण्याचा त्रासही यातून टळू शकतो.बिल्डरवर कारवाईची गरजविशेषत: लगतच्या अनेक ग्रामपंचायतींच्या परिसरात कित्येक नव्या वसाहती उभ्या झाल्या आहेत. येथे पाण्याच्या शोधात घरोघरी बोअरवेल केल्या गेल्या आहेत. हे पाणी क्षारयुक्त असल्याने या परिसरावर वॉटर फिल्टर विक्रेत्यांचा डोळा आहे. घरे विकताना बिल्डरने ग्राहकांना शुद्ध पाण्याची हमी दिलेली असते. मात्र, नंतर नागरिकांना वाऱ्यावर सोडले जाते. नव्या वसाहतींमधील नागरिकांना ना प्रशासन शुद्ध पाणी पुरवत ना बिल्डर. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची गरज आहे.गरजेची वस्तू बनली स्टेटस् सिम्बॉलवॉटर फिल्टर ही आरोग्यासाठी गरजेची वस्तू आहे. पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी या यंत्राचा चांगला उपयोग होतो. परंतु, हे यंत्र विकणारे एजंट ग्राहकांच्या घरी जाऊन घरी वॉटर फिल्टर असणे म्हणजे स्टेटस् सिम्बॉल असल्याचे भासवतात. अनेक गृहिणींचाही तसाच समज होतो. त्यातून ऐपतीपेक्षाही जादा किमतीचे यंत्र खरेदी केले जात आहे. हा पूर्णत: वैध व्यवहार असला तरी, विक्रेते व एजंटच्या शाब्दिक भुलभुलैयामुळे गरिबांना गरज नसताना खर्च करावा लागत आहे.