शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरिबांना मोफत धान्य मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:40 IST

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही गोरगरिबांना मोफत धान्य मिळाले नाही. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी आहे. यामुळे सामान्य नागरिकांवर ...

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही गोरगरिबांना मोफत धान्य मिळाले नाही. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी आहे. यामुळे सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. मोफत अन्नधान्य योजनेतून लाभार्थींना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचे १३ एप्रिलला जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर १५ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून राज्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले.

सरकारने मोफत जाहीर केलेले धान्य घेण्यासाठी तालुक्यातील हजारो शिधापत्रिकाधारकांनी शिधा वाटप दुकानांकडे धाव घेतली. मात्र, दुकानदारांकडून अद्याप मोफत धान्य वाटपासंदर्भात आदेश आले नाहीत, धान्याचा कोटा आला नाही, धान्य कधी येईल सांगता येत नाही, असे म्हणून टोलवले जात आहे. आतापर्यंत लॉकडाऊन काळात गोरगरीब लाभार्थींना रेशन दुकानातून मोफत धान्याचा पुरवठा करायला हवा होता. मात्र, तहसीलदारांचे धान्य वाटपाकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो लाभार्थींना मोफत धान्य मिळण्यासाठी मे महिना उजाडला आहे. अजून किती दिवस वाट पाहावी लागेल, हेसुद्धा सांगता येत नाही.

बॉक्स

केवळ आदेश आले, धान्य नाही

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत वाटपाचा आदेश प्राप्त झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी मे महिन्यात हाेईल की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण जिल्हा पुरवठा विभागाकडून तसा कोटा प्राप्त झाला नाही, असे सांगितले जात आहे.