शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

दारिद्र्यरेषेच्या सदोष सर्वेक्षणाचा गरीब व गरजवंत कुटुंबांना फटका

By admin | Updated: November 14, 2015 02:48 IST

गरिब आणि गरजवंत असूनही शासन योजनांच्या लाभापासून अनेक कुटुंबांना वंचित राहावे लागत आहे.

नेर : गरिब आणि गरजवंत असूनही शासन योजनांच्या लाभापासून अनेक कुटुंबांना वंचित राहावे लागत आहे. दारिद्र्यरेषेच्या सदोष सर्वेक्षणामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. आता या कुटुंबांना संबंधित शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. कुठलीही योजना किंवा उपक्रम राबविण्यासाठी शासनातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणावर आक्षेप घेतला जातो. त्यात बऱ्याचअंशी तथ्यही असते. शेतीबाबतच्या सर्वेक्षणात तर अनेकांवर अन्याय होतो, ही बाब सर्वश्रुत आहे. एकाच ठिकाणी बसून किंवा एखाद्या व्यक्तीमार्फत सर्वेक्षण करून घेतले जाते. या मात्र ज्यांचे नुकसान झाले, त्यांना लाभ अथवा मदतीपासून वंचित राहावे लागते. दारिद्र्यरेषेच्या कुटुंब सर्वेक्षणाच्या बाबतीतही असे प्रकार पुढे येत आहे. तालुक्याच्या उमरठा येथील अनुसूचित जातीमधील गरीब कुटुंबांना सदोष सर्वेक्षणाचा फटका बसला आहे. गेली अनेक वर्षांपासून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. संबंधित विभागाने पुन्हा सर्वेक्षण करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी ना.पंकजा मुंडे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. उमरठा येथील चरणदास डेरे, बापुराव भगत, गौतम नंदागवळी, बॅरिस्टर नंदागवळी, नथ्थुजी खोब्रागडे, चंद्रभान नन्नावरे, रमाबाई सोनोने, प्रमोद नन्नावरे, दिगांबर रामटेके आदींना २००२ च्या घरकूल यादीतून वगळण्यात आले. त्यांना अनेक वर्षांपासून शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळालेला नाही. अतिशय गरीब असतानाही त्यांना दारिद्र्यरेषेच्या यादीतून वगळण्यात आले. घरकुलाचा लाभ मिळालेला नसल्याने त्यांना उन्ह, पावसाचा मारा झेलत दिवस काढावे लागत आहे. अनेक शेजारी आधार घ्यावा लागतो.घरकूल आणि इतर योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी संबंधित विभागाला अनेकदा निवेदने दिली. उपसरपंच नंदू उके यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून ही समस्या मांडण्यात आली. मात्र कुणीही गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आता त्यांना ना.पंकजा मुंडे यांना निवेदन पाठवून न्यायाची याचना केली आहे. यावर काय कारवाई होते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)