शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

पहिल्याच पावसात वाहून गेला २५ लाखांचा पूल

By admin | Updated: June 25, 2015 02:28 IST

बांधकामाचे सर्व मापदंड गुंडाळून ठेवत निर्माण झालेला २५ लाख रुपयांचा पूल पहिल्याच पावसात वाहून गेला.

चार महिन्यांपूर्वी बांधकाम : वाढोणाबाजारच्या नागरिकांपुढे पुन्हा समस्याराळेगाव : बांधकामाचे सर्व मापदंड गुंडाळून ठेवत निर्माण झालेला २५ लाख रुपयांचा पूल पहिल्याच पावसात वाहून गेला. नवीन पुलावरून ये-जा करण्याची नवाईही फिटत नाही तोच वाढोणाबाजार येथील नागरिकांना भग्न झालेल्या मार्गावरून वाट काढावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या बोगस कारभाराचा हा उत्कृष्ट नमुना आहे. वाढोणाबाजार ते वडकी रोड या अप्रोच रस्त्यावर २०१५ या आर्थिक वर्षात पूल बांधकामास मंजुरी मिळाली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने फेब्रुवारी २०१५ मध्ये या कामाचा मुहूर्त साधला. सुमारे २५ लाख रुपये खर्च करून या पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र काम सुरू असताना जिल्हा परिषदेच्या तज्ज्ञांनी कधीही याची तपासणी केली नसावी किंवा कंत्राटदाराला सुट दिली असावी हे आता स्पष्ट होत आहे. या पुलावर टाकण्यात आलेल्या स्लॅबची जाडी केवळ दोन इंच आहे. दररोज शेकडो वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ राहणाऱ्या पुलाची जाडी किती असावी हे सांगण्यासाठी कुण्या तज्ज्ञाची गरज नाही. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी आणि या पुलाचे काम घेतलेल्या कंत्राटदाराने केवळ दोन इंच स्लॅब टाकूण आपल्या ‘कार्यकुशलते’चा परिचय दिला आहे. पुलाचे आयुष्य खुप नाही, ही बाब आधीच स्पष्ट होती. मात्र आता पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. वाढोणा बाजार परिसरात गुरूवारी जोरदार पाऊस झाला. नाले दुथडी भरून वाहिले. सदर पूल या पहिल्याच पावसात वाहून गेला. सोबतच लगतचा डांबरी रस्त्यानेही झालेल्या कामाचे पितळ उघडे पाडले. पुलाचा काही भाग आणि डांबरी रस्ताही वाहून गेल्यामुळे आता वाढोणाबाजार गावातील नागरिकांना वडकी रोडवर येण्यासाठी जुन्याच मार्गाचा उपयोग करावा लागणार आहे. नव्याने झालेल्या पुलामुळे हा फेरा कमी होणार होता. सदर कामाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)