शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२० शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:14 IST

२०१७ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २२ शेतकऱ्यांचा फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतरही फवारणी विषबाधेचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मागील दोन दिवसात २० जणांना विषबाधा झाल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ८१ जणांना विषबाधा झाली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

ठळक मुद्देपिकांवरील फवारणी पुन्हा जीवावर उठतेय : आणखी ८१ रुग्ण, संख्या वाढतीवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : २०१७ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २२ शेतकऱ्यांचा फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतरही फवारणी विषबाधेचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मागील दोन दिवसात २० जणांना विषबाधा झाल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ८१ जणांना विषबाधा झाली आहे.शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सततच्या ढगाळी वातावरणामुळे दोन्ही पिकांवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादूर्भाव जाणवत आहे. शेतकऱ्यांना कीड नियंत्रणासाठी फवारणी केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. रासायनिक शेती होत असल्याने घातक कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. कृषी विभाग शेतकऱ्यांना निंबोळी अर्क फवारण्याचा सल्ला देत आहे. मात्र याचा परिणाम किडींवर होत नाही. त्यामुळे घातक अशा कीटकनाशकांचे एक नव्हे तर तीन-तीन फवारण्या कराव्या लागत आहे. फवारणी करताना सुरक्षा कीट वापरणे व फवारणीबाबत अनेक तांत्रिक स्वरूपाची माहिती कृषी खात्यातील तज्ज्ञांकडून दिली जात आहे. कृषीतील फवारणीचे तंत्रज्ञान शेताच्या प्रात्यक्षिकात शक्य होणारे नाही, त्यामुळे अनेक भागात आजही परंपरागत पद्धतीनेच कीटकनाशक फवारणी होत आहे. यातूनच विषबाधेचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एकूण ८१ जणांना विषबाधा झाली असून वार्डात ३१ रुग्ण दाखल आहे.नव्याने २० रुग्ण दाखल झाले. एकाची प्रकृती गंभीर असून त्याला कृत्रिम जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. सहा जणांनाही गंभीर स्वरूपात विषबाधा आहे. सुदैवाने वैद्यकीय महाविद्यालयात एकाचाही विषबाधेने मृत्यू झाला नाही. केवळ आर्णी तालुक्यातील एका शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. त्याची नोंद शासकीय रुग्णालयात नाही.एकात्मिक कीड नियंत्रण प्रयोग संशयाच्या भोवऱ्यातकृषी विभागाकडून एकात्मिक कीड नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. यात कृषी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग असतो. त्याउपरही सातत्याने पिकांवर किडींचा प्रादूर्भाव होत आहे. यावर्षी तर अळ्यांचे प्रमाण अनाकलनीय असे आहे. यामुळे कृषी विभागाचा कीड नियंत्रण प्रयोगच संशयाच्या भोवºयात आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी