शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

२० शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:14 IST

२०१७ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २२ शेतकऱ्यांचा फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतरही फवारणी विषबाधेचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मागील दोन दिवसात २० जणांना विषबाधा झाल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ८१ जणांना विषबाधा झाली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

ठळक मुद्देपिकांवरील फवारणी पुन्हा जीवावर उठतेय : आणखी ८१ रुग्ण, संख्या वाढतीवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : २०१७ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २२ शेतकऱ्यांचा फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतरही फवारणी विषबाधेचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मागील दोन दिवसात २० जणांना विषबाधा झाल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ८१ जणांना विषबाधा झाली आहे.शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सततच्या ढगाळी वातावरणामुळे दोन्ही पिकांवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादूर्भाव जाणवत आहे. शेतकऱ्यांना कीड नियंत्रणासाठी फवारणी केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. रासायनिक शेती होत असल्याने घातक कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. कृषी विभाग शेतकऱ्यांना निंबोळी अर्क फवारण्याचा सल्ला देत आहे. मात्र याचा परिणाम किडींवर होत नाही. त्यामुळे घातक अशा कीटकनाशकांचे एक नव्हे तर तीन-तीन फवारण्या कराव्या लागत आहे. फवारणी करताना सुरक्षा कीट वापरणे व फवारणीबाबत अनेक तांत्रिक स्वरूपाची माहिती कृषी खात्यातील तज्ज्ञांकडून दिली जात आहे. कृषीतील फवारणीचे तंत्रज्ञान शेताच्या प्रात्यक्षिकात शक्य होणारे नाही, त्यामुळे अनेक भागात आजही परंपरागत पद्धतीनेच कीटकनाशक फवारणी होत आहे. यातूनच विषबाधेचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एकूण ८१ जणांना विषबाधा झाली असून वार्डात ३१ रुग्ण दाखल आहे.नव्याने २० रुग्ण दाखल झाले. एकाची प्रकृती गंभीर असून त्याला कृत्रिम जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. सहा जणांनाही गंभीर स्वरूपात विषबाधा आहे. सुदैवाने वैद्यकीय महाविद्यालयात एकाचाही विषबाधेने मृत्यू झाला नाही. केवळ आर्णी तालुक्यातील एका शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. त्याची नोंद शासकीय रुग्णालयात नाही.एकात्मिक कीड नियंत्रण प्रयोग संशयाच्या भोवऱ्यातकृषी विभागाकडून एकात्मिक कीड नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. यात कृषी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग असतो. त्याउपरही सातत्याने पिकांवर किडींचा प्रादूर्भाव होत आहे. यावर्षी तर अळ्यांचे प्रमाण अनाकलनीय असे आहे. यामुळे कृषी विभागाचा कीड नियंत्रण प्रयोगच संशयाच्या भोवºयात आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी