शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; महिलांनी केला छांगुर गँगचा पर्दाफाश
4
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
5
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
6
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
7
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
8
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
10
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
11
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
12
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
13
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
14
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
15
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
16
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
17
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
18
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
19
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
20
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी कार्यक्रम

By admin | Updated: September 10, 2015 03:08 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.

समिती स्थापन : २००१ पासून ३२८५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यायवतमाळ : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी हे समितीचे सदस्य सचिव आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न विचारात घेऊन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाने शासन निर्णय निर्गमित करून विविध विभागांसाठी राबविण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सद्यस्थितीत शासनाच्या लेखी २००१ पासून आतापर्यंत ३२८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी १३६३ आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्या असून १९०४ शेतकरी आत्महत्यांचे प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत तर १८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत ज्या जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची कार्यकक्षासुद्धा शासनाने ठरवून दिली आहे. त्यानुसार त्रस्त कुटुंब ओळखण्यासाठी ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून यादी बनविणे, शेती विषयक शासकीय योजना, कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत माहिती सर्व गावांमध्ये देणे, सामूहिक विवाहाचे महत्व पटवून देणे, व्यसनमुक्तीबाबत भजन कीर्तन व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करणे तसेच माहिती देण्याचा उपक्रम राबविणे, ग्रामस्तरावर नेमलेल्या समितीच्या कामकाजाचा नियमित आढावा घेणे, त्रस्त कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला समुपदेशन करण्याबाबतचे नियोजन व कार्यक्रम राबविणे, जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत ठराविक कालांतराने गावोगावी स्वास्थ शिबिर आयोजित करून मानसोपचार तज्ज्ञांची तसेच समाजसेवकांची सेवा उपलब्ध करून देणे, यादीतील कुटुंबांना पात्रतेनुसार संजय गांधी निराधार योजना, अन्नसुरक्षा योजना व इतर योजनांचा वैयक्तिक लाभ मिळेल याची खात्री करणे, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधूनिक पद्धतीने कमी खर्चाचा व कमीत कमी पाणी वापरून जास्तीत जास्त पीक घेण्याबाबतचे शेती विषयक प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्येक गावात राबवावेत, केंद्र व राज्यशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेती विषयक योजनांची व सोयी सवलतींची माहिती शेतकऱ्यांना अवगत करून देऊन त्यांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना होईल, यासाठी पाऊले उचलणे, प्रत्येक शेतकरी सहकारी सोसायटीचा सभासद होण्यास प्रवृत्त करण्यासाठी सभासद मोहीम राबविणे आदी कार्यांचा समावेश राहणार आहे. सदर जिल्हास्तरीय समितीला त्यांच्या जिल्ह्यात असलेल्या सेवाभावी संस्था, ट्रस्ट, कंपन्या, उद्योग संस्था इत्यादींकडून सीएसआरद्वारे निधी उभा करण्यास व त्याचा वापर या बाबींसाठी करण्याचे अधिकारसुद्धा देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)