शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फुलसावंगीच्या व्यापाऱ्याचे भरदिवसा नऊ लाख लुटले

By admin | Updated: February 28, 2017 01:20 IST

थील कृषी केंद्र चालकाला फोनवरून धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यामुळे धमकी देणाऱ्यांनी चक्क व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला करून....

सशस्त्र हल्ला : व्यापारी जखमी, बाजारपेठ कडकडीत बंद महागाव/फुलसावंगी : येथील कृषी केंद्र चालकाला फोनवरून धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यामुळे धमकी देणाऱ्यांनी चक्क व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला करून दुकानातून नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली असून घटनेच्या निषेधार्थ फुलसावंगीतील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. फुलसावंगीतील गौरी शंकर कृषी केंद्राचे संचालक संदेश मुत्तेपवार यांना गावातीलच आरोपी शाहरुख उर्फ टप्या याने रविवारी सायंकाळी फोनवरून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. या धमकीच्या दूरध्वनीमुळे घाबरलेल्या मुत्तेपवार यांनी गावातीलच मित्र मदन पांडे यांना हकीकत सांगितली. आरोपी शाहरुख हा नेमके पैसे कशासाठी मागतो याचा जाब विचारण्यासाठी हे दोघेही सोमवारी सकाळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गेले. तिथे आरोपी शाहरुख व त्याच्या तीन साथीदारांनी वाद घालून सत्तुराने हल्ला केला. यात मदन पांडे यांच्या हाताला व छातीला गंभीर दुखापत झाली. यानंतर हे आरोपी बाजारपेठेत आले. त्यांनी सुरेश जयस्वाल यांच्या दुकानात तोडफोड केली. नंतर संदेश मुत्तेपवार यांच्या माहूर रोडवरील गोदामात जाऊन तिथे दिवाणजी विलास राठोड याला धमकावून काऊंटरची चाबी मागितली. तेथून आठ लाख ७५ हजार रुपयांची रोख घेऊन हे आरोपी पसार झाले. या प्रकरणी संदेश मुत्तेपवार, मदन पांडे, सुरेश जयस्वाल या व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी आरोपी शाहरुख उर्फ टप्या सह तिघांवर खंडणी वसूल करणे, दहशत पसरविणे व दरोडा टाकणे याचा गुन्हा दाखल केला. भरदिवसा बाजारपेठेत चाललेल्या या दहशत नाट्यामुळे व्यापारी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. गावातील गुंड प्रवृत्तीच्या आरोपींकडून अशा कारवाया होत राहतात. व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकाविले जाते. हा प्रकार होण्यापूर्वी बाजारपेठ परिसर व व्यापाऱ्यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावरून आरोपींनी पूर्व नियोजित कट रचूनच हा दरोडा घातल्याचे दिसून येते. (लोकमत चमू) संदेश मुत्तेपवार यांच्याकडे तिसरा दरोडासंदेश मुत्तेपवार या व्यापाऱ्याकडे फुलसावंगीत टाकण्यात आलेला हा तिसरा दरोडा आहे. यापूर्वीसुद्धा त्यांच्या घरुन २५ लाखापेक्षा अधिकची रक्कम चोरीला गेली होती. त्यात बाबर टोळीचा समावेश असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. त्यापूर्वीसुद्धा मुत्तेपवार यांच्याकडे चोरी झाली होती आणि आता सोमवारी सकाळी पुन्हा त्यांच्याच गोदामातून रोख रक्कम नेण्यात आली. यामुळे हे कुटुंब पूर्णत: दहशतीत आले आहे. घटनेनंतरही पोलीस काहीच करीत नसल्याने तक्रार कशासाठी द्यायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी पुढाकार घेतल्यानंतर महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेची गांभीर्य ओळखून परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अजय बनसल यांनी महागाव ठाण्यात ठाण मांडले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेसुद्धा घटनास्थळाला भेट दिली. या गुन्ह्यात यवतमाळातील आरोपीचासुद्धा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.