शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चिबाड क्षेत्रातील पीक धोक्यात

By admin | Updated: August 9, 2016 02:28 IST

अतिपावसाने जिल्ह्यातील चिबाड क्षेत्राची पीक परिस्थिती हाताबाहेर गेली असून शेतात अक्षरश: तळी

यवतमाळ : अतिपावसाने जिल्ह्यातील चिबाड क्षेत्राची पीक परिस्थिती हाताबाहेर गेली असून शेतात अक्षरश: तळी साचली आहे. पिके पिवळी पडली असून सर्वाधिक फटका सोयाबीनला बसत आहे. महिनाभराची उघाड मिळाली तरी या शेतात आंतरमशागतीची कामे होण्याची सुतराम शक्यता नाही. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. महागाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ११२ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. महागाव पाठोपाठ इतर तालुके वार्षिक सरासरी ओलांडण्याच्या वाटेवर आहेत. सततचा पाऊस काही तालुक्यामध्ये प्रचंड हानिकारक ठरत आहे. यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांची प्रकाश संश्लेषण क्रिया थांबली आहे. याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात नदीकाठचा भाग, धरणालगतचा परिसर, खोलगट भाग, अशा ठिकाणची पिके मोठ्या प्रमाणात चिबाडली आहे. या भागात जमिनीची खतग्रहण करण्याची क्षमता संपली आहे. मुळे ढिली होऊन सडत आहेत. यामुळे काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणी खोड किडीचा ‘अटॅक’ झाला आहे. चक्रभुंग्याचेही आक्रमण झाले आहे. मात्र या रोगाचे प्रमाण कमी आहे. सोयाबीनची वाढ खुंटली पाणथळ जागेवर असलेले सोयाबीन वाढ खुंटल्याने वितभर असतानाच त्याला फुले लागली आहेत. या झाडाची वाढ खुंटल्याने पाणथळ जागेवर सोयाबीनचे उत्पादन घटण्याचा धोका आहे. उडीदावर मावाच्या ‘अटॅक’ यंदा उडीद आणि मुगाच्या क्षेत्रात वाढ झाली असली तरी मुगावर आणि उडदावर मावा, तुडतुडे या रसशोषण करणाऱ्या किडीचे आक्रमण झाले आहे. यामुळे पाने लालसर पडून गळत असल्याचे दिसत आहे. (शहर वार्ताहर) तूर जळाली : ३० टक्के क्षेत्र प्रभावित ४कडधान्याच्या क्षेत्र जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक आहे. यामध्ये प्रामुख्याने तूर पिकाचा समावेश आहे. जिल्ह्यात यावर्षी एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात अंतरपीक म्हणून तुरीची लागवड करण्यात आली. तुरीला अधिक पाणी घातक आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तूर जळाली. यानंतर शेतकऱ्यांनी दुबार टोबणी केली. मात्र ही तूर वानीने खाल्ली. यामुळे एकूण लागवडीच्या ३० टक्के क्षेत्र घटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पऱ्हाटी अजूनही पाच पानांच्यावर सरकली नाही ४जिल्ह्यात कापसाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. असे असले तरी अधिक पाण्याने पानबसन भागातील पऱ्हाटी खुलली नाही. तिची जोमाने वाढ झाली नाही. काही ठिकाणी तण वाढले. पऱ्हाटीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात गवत दिसत आहे. या ठिकाणी तणनाशकाची फवारणी केल्यानंतरही गवत वाढल्याची बाब पुढे आली आहे. रोगाला अनुकूल अशी पीक परिस्थिती नाही. मात्र आणखी पाऊस आल्यास पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. उघाड पडल्यानंतर ढगाळी वातावरणाने अळीचा ‘अटॅक’ होण्याची भीती आहे. सध्या पीक निकोप अवस्थेत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी सजग राहून पिकांवर कुठल्या रोगाची लक्षणे दिसत आहे, त्यानुसार उपाययोजना कराव्या. - डॉ. अनिल ठाकरे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ