शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा तालुक्यात ‘गावठी, देशी’ दारूची विक्री जोरात, दारूबंदी नावालाच : राजरोस विक्री, उत्पादन शुल्क विभागही सध्या चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:40 IST

तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज दारूचा चोरटा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील मोहदा, रुंझा, करंजी, पहापळ, पाटणबोरी या गावांसह ...

तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज दारूचा चोरटा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील मोहदा, रुंझा, करंजी, पहापळ, पाटणबोरी या गावांसह अनेक गावांमध्ये अवैधरीत्या दारू गाळण्याचा, तसेच देशी, विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्थानिकांना विशेष करून महिलांना मोठा त्रास होत आहे. कित्येक कुटुंबामध्ये कलहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे, तसेच सामाजिक आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे काही गावात दारूबंदी आहे, तर दुसरीकडे जवळील महामार्गावर, राज्य मार्गावर अनेक ढाब्यावर, हॉटेलमध्ये हजारो रुपयांची विनापरवाना दारूमुळे किमतीच्या दुप्पट विक्री केली जात आहे. यामुळे गावठीसह देशी दारूचा व्यवसायही जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यात ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू करून अनेकांनी उच्छाद मांडला आहे. अवैध दारू व्यावसायिक यात मालामाल होतानाही दिसत आहे. तालुक्यात चोरट्या मार्गाने दारूमाफिया दारूसाठा उपलब्ध करीत आहेत. काही गावांमधून गावठी दारू व पांढरकवडा येथून देशी दारू दुचाकी व चारचाकी वाहनाद्वारे इतर ठिकाणच्या अवैध व्यावसायिकाकडे पोहोचविल्या जात आहे. काही गावांत तर नियमितपणे दररोज ही अवैध दारू पोहोचविल्या जात आहे. ही दारू कोठून येते व कुठे कुठे जाते, याची संपूर्ण माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे, परंतु याकडे हे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले जात आहे, तर उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादानेच अनेक अवैध दारू व्यावसायिकांची हिंमत वाढल्याचेही सांगितले जात आहे. अवैध व्यावसायिक व अधिकाऱ्यांमध्ये अर्थकारण असल्याचा आरोप आहे. तालुक्यात अनेक गावांत ठिकठिकाणी महिला बचत गटाच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतीने दारूबंदीसाठी ठराव घेतले असले, तरी अशा दारू विक्रीमुळे महिलांच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. कमी वेळात व कमी श्रमात श्रीमंत होण्याच्या नादात अनेक जण या गावठी दारू व देशी दारूच्या अवैध व्यवसायात उतरले आहेत. दारू अधिक प्रभावी व्हावी, यासाठी अनेक घातक पदार्थही मिसळले जात असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांना असाध्य अशा विविध आजारांनी ग्रासले आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.