शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पंचायत समित्यांवर वर्चस्वासाठी रस्सीखेच

By admin | Updated: December 23, 2016 02:20 IST

जिल्ह्यातील १६ पंचायत समितींवरील वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

१२२ जागा : सत्ताधाऱ्यांचा लागणार कस, मतदारसंघाची पुनर्रचना यवतमाळ : जिल्ह्यातील १६ पंचायत समितींवरील वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यासाठी सध्या पक्षांतराला महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेत यापूर्वी ६२, तर १६ पंचायत समितींमध्ये १२४ जागा जागा होत्या. २०११ च्या जनगणनेनुसार यावेळी मतदार संघांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची एक, तर पंचायत समितींच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. परिणामी आता जिल्हा परिषदेत ६१, तर सर्व पंचायत समितींमध्ये १२२ सदस्य निवडून येणार आहे. त्यासाठी येत्या फेब्रुवारीत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्याचा ग्रामीण भाग ढवळून निघणार आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची तूर्तास सत्ता कायम आहे. बहुतांश पंचायत समित्याही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. ग्रामीण भागावर या दोन पक्षांची चांगलीच पकड आहे. मात्र गेल्या दोन वर्षात राजकीय चित्र पूर्णपणे पालटले आहे. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतही या दोन पक्षानी चांगलेच यश मिळविले आहे. त्यामुळे या दोनही पक्षांनी आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही पक्षांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून इतर पक्षांतील कार्यकर्ते आपल्या जाळ्यात ओढण्याचे सत्र या पक्षांनी सुरू केले. यात काही कार्यकर्ते त्यांच्या गळालाही लागले. केंद्र आणि राज्यातील सत्ता व नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतील निकालामुळे दुसऱ्या पक्षांतील काठावरील कार्यकर्ते या दोन पक्षांच्या मोहात अडकत आहे. यातून पंचायत समितींवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)