शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पंचायत समित्यांवर वर्चस्वासाठी रस्सीखेच

By admin | Updated: December 23, 2016 02:20 IST

जिल्ह्यातील १६ पंचायत समितींवरील वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

१२२ जागा : सत्ताधाऱ्यांचा लागणार कस, मतदारसंघाची पुनर्रचना यवतमाळ : जिल्ह्यातील १६ पंचायत समितींवरील वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यासाठी सध्या पक्षांतराला महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेत यापूर्वी ६२, तर १६ पंचायत समितींमध्ये १२४ जागा जागा होत्या. २०११ च्या जनगणनेनुसार यावेळी मतदार संघांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची एक, तर पंचायत समितींच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. परिणामी आता जिल्हा परिषदेत ६१, तर सर्व पंचायत समितींमध्ये १२२ सदस्य निवडून येणार आहे. त्यासाठी येत्या फेब्रुवारीत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्याचा ग्रामीण भाग ढवळून निघणार आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची तूर्तास सत्ता कायम आहे. बहुतांश पंचायत समित्याही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. ग्रामीण भागावर या दोन पक्षांची चांगलीच पकड आहे. मात्र गेल्या दोन वर्षात राजकीय चित्र पूर्णपणे पालटले आहे. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतही या दोन पक्षानी चांगलेच यश मिळविले आहे. त्यामुळे या दोनही पक्षांनी आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही पक्षांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून इतर पक्षांतील कार्यकर्ते आपल्या जाळ्यात ओढण्याचे सत्र या पक्षांनी सुरू केले. यात काही कार्यकर्ते त्यांच्या गळालाही लागले. केंद्र आणि राज्यातील सत्ता व नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतील निकालामुळे दुसऱ्या पक्षांतील काठावरील कार्यकर्ते या दोन पक्षांच्या मोहात अडकत आहे. यातून पंचायत समितींवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)