शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पंचायत समित्यांवर वर्चस्वासाठी रस्सीखेच

By admin | Updated: December 23, 2016 02:20 IST

जिल्ह्यातील १६ पंचायत समितींवरील वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

१२२ जागा : सत्ताधाऱ्यांचा लागणार कस, मतदारसंघाची पुनर्रचना यवतमाळ : जिल्ह्यातील १६ पंचायत समितींवरील वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यासाठी सध्या पक्षांतराला महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेत यापूर्वी ६२, तर १६ पंचायत समितींमध्ये १२४ जागा जागा होत्या. २०११ च्या जनगणनेनुसार यावेळी मतदार संघांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची एक, तर पंचायत समितींच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. परिणामी आता जिल्हा परिषदेत ६१, तर सर्व पंचायत समितींमध्ये १२२ सदस्य निवडून येणार आहे. त्यासाठी येत्या फेब्रुवारीत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्याचा ग्रामीण भाग ढवळून निघणार आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची तूर्तास सत्ता कायम आहे. बहुतांश पंचायत समित्याही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. ग्रामीण भागावर या दोन पक्षांची चांगलीच पकड आहे. मात्र गेल्या दोन वर्षात राजकीय चित्र पूर्णपणे पालटले आहे. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतही या दोन पक्षानी चांगलेच यश मिळविले आहे. त्यामुळे या दोनही पक्षांनी आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही पक्षांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून इतर पक्षांतील कार्यकर्ते आपल्या जाळ्यात ओढण्याचे सत्र या पक्षांनी सुरू केले. यात काही कार्यकर्ते त्यांच्या गळालाही लागले. केंद्र आणि राज्यातील सत्ता व नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतील निकालामुळे दुसऱ्या पक्षांतील काठावरील कार्यकर्ते या दोन पक्षांच्या मोहात अडकत आहे. यातून पंचायत समितींवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)