शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोवळ्या सोयाबीन कोंबावर वानूचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:28 IST

महागाव : शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवडीवर भर दिला. मात्र, उगवलेल्या कोवळ्या सोयाबीनच्या कोंबांना वाणू नष्ट करीत आहेत. वाणूचा हल्ला ...

महागाव : शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवडीवर भर दिला. मात्र, उगवलेल्या कोवळ्या सोयाबीनच्या कोंबांना वाणू नष्ट करीत आहेत. वाणूचा हल्ला मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी धास्तावले आहे.

गेल्यावर्षी वाणूच्या प्रकोपाने तालुक्यातील सोयाबीनचे अनेक प्लॉट उद‌्ध्वस्त झाले होते. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाकडून वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. कपाशीवर दरवर्षी होणाऱ्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवडीवर लक्ष केंद्रित केले. ज्या शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे उपलब्ध होते, अशांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर लागवड केली. आता उगवलेल्या कोवळ्या कोंबावर वाणूचा हल्ला वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी विनोद मैंद यांनी सोयाबीनची नुकतीच लागवड केली. मात्र, उगवलेल्या सोयाबीनच्या कोवळ्या कोंबांवर वाणूचा हल्ला होत असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात ६८ हजार हेक्‍टर लागवड क्षेत्रावर यंदा सोयाबीन आणि तुरीचा पेरा वाढला आहे. कपाशी लागवड पहिल्यांदाच दहा टक्क्यांवर आली आहे. कपाशीवर दरवर्षी येणाऱ्या विविध रोगांमुळे शेतकऱ्यांनी यंदा जवळपास कपाशी हद्दपार केल्याचे चित्र दिसून येत आहे.

बॉक्स

कपाशी बीजोत्पादन कंपन्यांना धडकी

कपाशीवर विविध रोगांच्या प्रादुर्भावाची संबंधित कंपन्यांनी पाहिजे तशी दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत परिवर्तन करून नवीन प्रयोग अंगिकारला. त्यामुळे कपाशी बियाणे बीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना धडकी भरली आहे.

कोट

अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर वाणूचा प्रादुर्भाव होतो. जोराचा पाऊस कोसळून गेल्यावर रिमझिम पाऊस असल्याससुद्धा वाणूचा प्रादुर्भाव वाढतो. यावर आंतर पीक डवरणी, मशागत हे अत्यंत प्रभावी ठरते. वाणूचे आयुर्मान जास्त दिवस नसते. दोन आठवडे याचा प्रादुर्भाव राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंतर मशागत केल्यास वाणूचा प्रादुर्भाव कमी होतो.

प्रमोद यादगिरावार, वरिष्ठ शास्त्रज्ञ, के.व्ही.के. यवतमाळ.