शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

वीज वितरणविरुद्ध उद्रेक

By admin | Updated: September 30, 2014 23:42 IST

वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना विजेअभावी सिंचन रखडले आहे. यामुळे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

महागाव तालुका : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटलामहागाव/बिजोरा : वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना विजेअभावी सिंचन रखडले आहे. यामुळे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटत असून शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकत आहे. महागाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाचा पत्ता नाही. पोळ्याच्या आठवड्यात कोसळलेल्या पावसाने पिके जोमाने वाढत होती. मात्र आता उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत असल्याने पीक करपत आहे. अशा स्थितीत शेतकरी ओलित करण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ओलित करणे शक्य होत नाही. मुडाणा उपकेंद्रांतर्गत बिजोरा, कोठारी या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील शेतकरी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले. या ठिकाणी कोणताही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. चौकशी केली असता अधिकारी यवतमाळला असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकरी सहायक अभियंता कार्यालयावर धडकले. परंतु त्या ठिकाणीही अधिकारी हजर नव्हता. परंतु या ठिकाणी सवना येथील शाखा अभियंता झामरे उपस्थित होते. त्यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनीसुद्धा उडवाउडवीचे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले. सवना फिडरवरील गावे कोठारी फिडरवर का जोडण्यात आली, असा सवाल करण्यात आला. परंतु शेतकऱ्यांना समाधानकर उत्तरे देऊ शकली नाही. कोठारी, बिजोरा या ठिकाणी दोन ट्रान्सफार्मर उभे केले आहे. परंतु एकही कार्यान्वित केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ओलित करणे शक्य होत नाही. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकरी वारंवार विनंती करतात. परंतु कुणीही दखल घेत नाही. अशीच परिस्थिती महागाव तालुक्यातील करंजखेड जुने येथील आहे. येथील सिंगल फेजची डीपी गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. वारंवार विनंती करूनही उपयोग झाला नाही. काही दिवसापूर्वी तर शेतकऱ्यांनी मोर्चाही काढला होता. परंतु उपयोग झाला नाही. अद्यापही सिंगल फेज योजना सुरू झाली नाही. शेतातील डीपीवरूनच गावाला वीज पुरवठा केला जात आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. गेल्या वर्षभरापासून शेतकरी त्रस्त झाले आहे. यावर उपाययोजना करावी म्हणून करंजखेडचे शेतकरी वीज वितरण कंपनीच्या महागाव कार्यालयावर पोहोचले. या ठिकाणी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रवीण ठाकरे, चेतन ठाकरे, शेषराव देशमुख, रमेश भांगे, किशोर अडकिने, सुभाष भांगे, अमित भांगे, नथ्थू भांगे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. परंतु या शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. अशीच स्थिती महागाव तालुक्यातील इतरही गावांची आहे. गावामध्ये वीज पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच कृषी फिडरवरील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू शकतो. परंतु वीज वितरण कंपनी कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)