शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईने जलयुक्तचे पितळ उघडे

By admin | Updated: April 20, 2017 00:32 IST

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे पितळ पाणीटंचाईने उघडे पाडले आहे.

पुसद व उमरखेड उपविभाग : पावसाळ्यात तुडुंब दिसणारे प्रकल्प कोरडे ठण्ण पुसद : शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे पितळ पाणीटंचाईने उघडे पाडले आहे. पावसाळ्यात तुडुंब झालेल्या शेततळ्यासह सर्व तलाव आता कोरडे ठण्ण पडले आहे. गावागावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलयुक्तशिवार योजनेच्या कामांची चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते. पुसद आणि उमरखेड उपविभागातील चारही तालुक्यांमध्ये पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली होती. महसूल, जिल्हा परिषद, वन विभाग, कृषी, पाटबंधारे आदी विभागांच्या माध्यमातून ठिकठिकाणी जलयुक्तशिवारची कामे करण्यात आली होती. शेततळे, शेतीबांध, कालवे, ढाळीचे बांध, नाले खोलीकरण, नदीवर बंधारे, विहिरींचे खोलीकरण आदी शेकडो कामे करण्यात आली. यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या कामांचे छायाचित्र प्रकाशित करून प्रत्येक विभागाने आपली पाठही थोपटून घेतली होती. उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात होईल, असे छातीठोकपणे सांगितले जात होते. मात्र या कामांचा दर्जा कुणीही तपासला नाही. हिवाळा लागताच या जलयुक्तच्या कामातील फोलपणा उघड होऊ लागला. उन्हाळ्यात तर जलयुक्तच्या कामाचा बोजवाराच उडाल्याचे दिसून आले. चारही तालुक्यात झालेली कामे कंत्राटदारांनी कशा पद्धतीने केली, हे सर्वश्रृत आहे. सध्या पुसद आणि उमरखेड उपविभागातील गावागावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पैनगंगा आणि पूस नदी कोरडी पडल्याने दोनही नदीच्या तीरावरील हजारो नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. उमरखेड तालुक्यात तर मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली होती. परंतु आता या तालुक्यातच सर्वाधिक पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महागाव तालुक्याचीही अशीच अवस्था आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भागात मोठ्या प्रमाणात जलयुक्तची कामे झाल्याचा दावा करण्यात आला. परंतु माळपठारावर आता निर्माण झालेली पाणीटंचाई या कामाची गुणवत्ता सिद्ध करीत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चारही पंचायत समितींनी कृती आराखडा तयार केला आहे. गतवर्षीच्या गावांची नावे आणि यंदाच्या कृती आराखड्यात असलेल्या गावांची नावे अपवाद वगळता सारखीच आहे. जलयुक्त शिवारची कामे झालेली गावेही पाणीटंचाईच्या यादीत दिसत आहे. काही गावात तर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. दरवर्षी पाणीटंचाईच्या नावाखाली लाखो रुपये उधळल्या जातात. परंतु तीच ती गावे पाणीटंचाईच्या यादीत दिसून येतात. जलयुक्तशिवारच्या कामानंतर ही गावे टंचाईमुक्त होतील, अशी अपेक्षा एप्रिल महिन्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईने फोल ठरविली. (कार्यालय चमू)