शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

निळोणा प्रकल्पात केवळ नऊ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: March 28, 2016 02:24 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात नऊ टक्के तर चापडोह प्रकल्पात ५३ टक्के पाणी शिल्लक आहे.

यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात नऊ टक्के तर चापडोह प्रकल्पात ५३ टक्के पाणी शिल्लक आहे. निळोण्याचे पाणी ३० एप्रिलपर्यंत पुरणार आहे. मेपासून इमर्जन्सी पम्पिंग करावे लागणार आहे. यामुळे यवतमाळकरांना सध्या जपून पाणी वापरावे लागणार आहे. दोन दिवसा आड होणारा पाणीपुरवठा लांबणार आहे.शहरासह लगतच्या गावांना जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. प्राधिकरणावरच सर्वसामान्यांचे पाण्याचे गणित अवलंबून आहे. गतवर्षी पावसाळ्यापूर्वीच प्रयासच्या माध्यमातून गाळ काढण्यात आला होता. निळोणा जलाशय ओव्हरफ्लो झाले होते. या जलाशयातील पाणी अधिक काळ टिकेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नागरिकांचा भार वाढल्याने जलशयाने लवकरच तळ गाठला आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने पाण्याची पातळी झपाट्याने घसरत आहे.सध्या जलाशयामध्ये ३० एप्रिलपर्यंत पुरू शकेल इतकेच ९ टक्के पाणी शिल्लक आहे. यानंतर इमर्जन्सी पम्पिंग करावी लागणार आहे. गत तीन चार वर्षांत प्रथमच अशा स्वरूपाचे पाऊल प्राधिकरणाला उचलावे लागणार आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. निळोण्यापेक्षा अधिक जलसाठा चापडोह प्रकल्पात शिल्लक आहे. या ठिकाणी ५३ टक्के साठा आहे. यामुळे पुढील काळात यवतमाळच्या पाणीपुरवठ्याची भिस्त चापडोहवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)चार कोटींची थकबाकी ४जीवन प्राधिकरणाला थकीत ग्राहकांकडून ११ कोटींची वसुली करायची होती. प्रत्यक्षात सात कोटींची वसुली झाली. चार कोटींची थकबाकी अद्यापही कायम आहे. यामुळे भविष्यात पाण्याच्या कर वसुलीची अडचण वाढण्याची शक्यता आहे.