शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

तालुक्यात आजपर्यंत केवळ ६७ मिलीमीटरच पाऊस

By admin | Updated: June 26, 2014 00:02 IST

यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर गेल्या १७ जूनपर्यंत तालुक्यात केवळ ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर १८ जूनपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी खोळंबली आहे.

वणी : यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर गेल्या १७ जूनपर्यंत तालुक्यात केवळ ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर १८ जूनपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी खोळंबली आहे. कृषी विभागाने ७0 टक्के पेरणी झाल्याचे सांगितले. रोहिणी नक्षत्र सुरू होताच शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी धावपळ सुरू केली होती. ८ जूनपासून मृगाला सुरूवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा होती. सुरूवातीला पाऊस आला. त्यामुळे १७ जूनपर्यंत ६७ मिलीमीटर पावसाची नोंदही झाली. त्यात एकाच दिवशी १७ जूनला सर्वाधिक ४६ मिलीमीटर पाऊस झाला. मागीलवर्षी १७ जूनपर्यंत तब्बल ४00 मिलीमीटर पाऊस झाला होता, हे विशेष. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील वर्षीचा अदमास घेत पेरणीसाठी लगबग सुरू केली होती. तथापि १८ जूनपासून पावसाने दडी मारल्याने आता तालुक्यात उर्वरित पेरणीच खोळंबली आहे. मागीलवर्षी आजपर्यंत अर्थात २५ जूनपर्यंत तब्बल ४३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी मात्र केवळ ६७ मिलीमीटरच पाऊस झाला आहे. किमान ७0 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करून नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र मृगातच पेरणी साधते, असा अनुभव असल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे. आता ही संपूर्ण धूळ पेरणी उलटण्याच्या मार्गावर आहे. पावसाचे कोणतेही संकेत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात एकूण ९२ हजार ३१८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ६४ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीयोग्य आहे. यावर्षी त्यापैकी ६२ हजार ७९३ हेक्टरवर खरीपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यातील ४६ हजार ३७0 हेक्टरवर कपाशीची पेरणी होण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी ४२ हजार ३३८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. कृषी विभागाच्या माहितीनुसार आजपर्यंत त्यापैकी जवळपास तब्बल ७0 टक्के अर्थात किमान ३0 हजार हेक्टरवर कपाशी पेरणी झाली. मात्र ही सर्व पेरणी आता पावसाअभावी उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात मागीलवर्षी ११ हजार ९९७ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली होती. यावर्षी सोयाबिनचा पेरा कमी होणार असून १0 हजार ७९८ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी सोयाबिनची पेरणीही रखडली आहे. मात्र सोयाबिनची परेणी करण्यास अद्याप अवधी आहे. तथापि कपाशीची पेरणी मात्र त्वरित करणे गरजेचे आहे. पावसाने दडी मारल्याने आता कपाशीची पेरणीच संकटात सापडली आहे. पेरणीला उशीर झाल्यास उत्पन्नात घट येण्याची शक्यता तालुक्यातील २६ हजार शेतकऱ्यांना सतावत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)