शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ४८ टक्के जलसाठा

By admin | Updated: August 26, 2014 23:43 IST

वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे.

पाणी जपून वापरा : वार्षिक सरासरीच्या ४१ टक्केच पाऊसयवतमाळ : वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे. अन्यथा आगामी उन्हाळ्यात शहराला आठ ते दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याची वेळ प्राधिकरणावर येण्याची चिन्हे आहेत. जून, जुलै व आॅगस्ट हेच खरे पावसाळ्याचे महिने आहेत. परंतु या महिन्यातच जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिमी आहे. परंतु आता आॅगस्ट संपायला आला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४१ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील कोणतेही धरण अद्याप ओव्हर-फ्लो झाले नाही. ऐरव्ही ऐन जुलैच्या मध्यातच सर्व धरणे ओव्हर-फ्लो झाल्याचे छायाचित्र सर्वत्र झळकतात. यावर्षी मात्र अद्यापही ही स्थिती आलेली नाही. पावसाचा मंदावलेला वेग लक्षात घेता यावर्षी धरणे ओव्हर-फ्लो होणार की नाही याबाबतच साशंकता आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात केवळ ४८ टक्के तर चापडोह धरणात केवळ ४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण भरायला आणखी ५० टक्के पावसाची आवश्यकता आहे. एरव्ही मे-जूनमध्ये पाणी कपात करणाऱ्या जीवन प्राधिकरणावर यावेळी ऐन पावसाळ्यात पाणी कपात करण्याची वेळ आली आहे. सध्याच चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार याची चिन्हे आताच दिसू लागली आहे. सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा राखून ठेवणे, पाण्याची बचत करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज प्रशासनात निर्माण झाली आहे. नागरिकांनीही पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे. यंदा पावसाळा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने फारपूर्वी वर्तविला होता. मात्र त्या दृष्टीने प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही. पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ नये म्हणून प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागणार आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व नागरिकांनी संयुक्त प्रयत्न केल्यास उपलब्ध पाणीसाठ्याचे जतन करून भविष्यातील पाणीटंचाईच्या अडचणीवर तोडगा काढता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची प्रतीक्षा आहे. (शहर वार्ताहर)