शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

केवळ ४८ टक्के जलसाठा

By admin | Updated: August 26, 2014 23:43 IST

वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे.

पाणी जपून वापरा : वार्षिक सरासरीच्या ४१ टक्केच पाऊसयवतमाळ : वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे. अन्यथा आगामी उन्हाळ्यात शहराला आठ ते दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याची वेळ प्राधिकरणावर येण्याची चिन्हे आहेत. जून, जुलै व आॅगस्ट हेच खरे पावसाळ्याचे महिने आहेत. परंतु या महिन्यातच जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिमी आहे. परंतु आता आॅगस्ट संपायला आला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४१ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील कोणतेही धरण अद्याप ओव्हर-फ्लो झाले नाही. ऐरव्ही ऐन जुलैच्या मध्यातच सर्व धरणे ओव्हर-फ्लो झाल्याचे छायाचित्र सर्वत्र झळकतात. यावर्षी मात्र अद्यापही ही स्थिती आलेली नाही. पावसाचा मंदावलेला वेग लक्षात घेता यावर्षी धरणे ओव्हर-फ्लो होणार की नाही याबाबतच साशंकता आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात केवळ ४८ टक्के तर चापडोह धरणात केवळ ४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण भरायला आणखी ५० टक्के पावसाची आवश्यकता आहे. एरव्ही मे-जूनमध्ये पाणी कपात करणाऱ्या जीवन प्राधिकरणावर यावेळी ऐन पावसाळ्यात पाणी कपात करण्याची वेळ आली आहे. सध्याच चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार याची चिन्हे आताच दिसू लागली आहे. सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा राखून ठेवणे, पाण्याची बचत करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज प्रशासनात निर्माण झाली आहे. नागरिकांनीही पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे. यंदा पावसाळा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने फारपूर्वी वर्तविला होता. मात्र त्या दृष्टीने प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही. पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ नये म्हणून प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागणार आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व नागरिकांनी संयुक्त प्रयत्न केल्यास उपलब्ध पाणीसाठ्याचे जतन करून भविष्यातील पाणीटंचाईच्या अडचणीवर तोडगा काढता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची प्रतीक्षा आहे. (शहर वार्ताहर)