शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
2
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
3
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
4
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
5
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
6
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
7
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
8
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
9
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
10
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
11
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
12
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
13
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
14
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
15
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
16
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
17
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
18
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
19
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
20
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला

केवळ ४८ टक्के जलसाठा

By admin | Updated: August 26, 2014 23:43 IST

वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे.

पाणी जपून वापरा : वार्षिक सरासरीच्या ४१ टक्केच पाऊसयवतमाळ : वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे. अन्यथा आगामी उन्हाळ्यात शहराला आठ ते दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याची वेळ प्राधिकरणावर येण्याची चिन्हे आहेत. जून, जुलै व आॅगस्ट हेच खरे पावसाळ्याचे महिने आहेत. परंतु या महिन्यातच जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिमी आहे. परंतु आता आॅगस्ट संपायला आला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४१ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील कोणतेही धरण अद्याप ओव्हर-फ्लो झाले नाही. ऐरव्ही ऐन जुलैच्या मध्यातच सर्व धरणे ओव्हर-फ्लो झाल्याचे छायाचित्र सर्वत्र झळकतात. यावर्षी मात्र अद्यापही ही स्थिती आलेली नाही. पावसाचा मंदावलेला वेग लक्षात घेता यावर्षी धरणे ओव्हर-फ्लो होणार की नाही याबाबतच साशंकता आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात केवळ ४८ टक्के तर चापडोह धरणात केवळ ४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण भरायला आणखी ५० टक्के पावसाची आवश्यकता आहे. एरव्ही मे-जूनमध्ये पाणी कपात करणाऱ्या जीवन प्राधिकरणावर यावेळी ऐन पावसाळ्यात पाणी कपात करण्याची वेळ आली आहे. सध्याच चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार याची चिन्हे आताच दिसू लागली आहे. सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा राखून ठेवणे, पाण्याची बचत करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज प्रशासनात निर्माण झाली आहे. नागरिकांनीही पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे. यंदा पावसाळा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने फारपूर्वी वर्तविला होता. मात्र त्या दृष्टीने प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही. पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ नये म्हणून प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागणार आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व नागरिकांनी संयुक्त प्रयत्न केल्यास उपलब्ध पाणीसाठ्याचे जतन करून भविष्यातील पाणीटंचाईच्या अडचणीवर तोडगा काढता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची प्रतीक्षा आहे. (शहर वार्ताहर)