शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

राष्ट्रीयकृत बँकेने दिले केवळ ३७ टक्के कर्ज

By admin | Updated: July 8, 2016 02:23 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी कर्ज मिळावे म्हणून शासन आणि प्रशासन सज्ज होते.

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ : ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ कुचकामीरूपेश उत्तरवार यवतमाळ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी कर्ज मिळावे म्हणून शासन आणि प्रशासन सज्ज होते. मात्र विविध बैठका आणि आदेशानंतरही जिल्हा बँकांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठच चोळले. प्रत्यक्षात राष्ट्रीयकृत बँकांनी उद्दीष्टाच्या केवळ ३७ टक्केच कर्ज वितरण केले. ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रमालाही या बँकांनी पायदळी तुडविल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात १७३६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ३० जूनपर्यंत संपूर्ण कर्जाचे वितरण करणे बँकांनी अपेक्षित होते. यासाठीच अर्ज द्या, कर्ज घ्या उपक्रमही राबविण्यात आला. एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तत्काळ कर्ज वितरणाचे आदेश दिले. तर पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी बैठक घेऊन बँकांना तशा सूचना दिल्या. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जच मिळाले नाही. राष्ट्रीयकृत बँका कर्ज वितरणास इच्छुक नसतात. बैठकीत होकार देतात परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे या बँकातून शेतकऱ्यांना कर्जच मिळत नाही. स्टेट बँक आॅफ हैदराबादला १२ कोटी ९९ लाख रुपये कर्जाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७६ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले. बँक आॅफ इंडियाला ९२ कोटी ९३ लाखांचे उद्दीष्ट होते. प्रत्यक्षात पाच कोटीचेच कर्ज वितरित करण्यात आले. बँक आॅफ महाराष्ट्रने १८० कोटी पैकी ५८ कोटींचे कर्ज वितरित केले. स्टेट बँक आॅफ इंडियाला ४६४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करायचे होते. प्रत्यक्षात त्यांनी १६७ कोटी रुपयांचेच कर्ज वितरित केले आहे. इंडियन ओव्हरसीस बँकेने ६ कोटी ८० लाखांपैकी एक कोटी २४ लाखांचे कर्ज वितरित केले. राष्ट्रीयकृत बँकांचा गतवर्षीपेक्षा आकडा यंदा सूत भर वाढला असला तरी शासनाच्या मूळ उद्देशाला मात्र फाटा बसला आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्ज पुनर्गठनात अनेक शेतकरी वंचित असून अनेक शेतकरी आजही बँकांचे उंबरठे झिजविताना दिसून येतात. राष्ट्रीयकृत बँका शासन आणि प्रशासनालाही जुमानत नसल्याचे पीक कर्ज वाटपावरून जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्हा बँकेने राखली शान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे अपुरा निधी असतानाही त्यांनी आपल्या उद्दीष्टाच्या ७७ टक्के कर्ज वितरण केले आहे. उलट राष्ट्रीयकृत बँकांकडे मुबलक निधी असतानाही केवळ ३७ टक्केच कर्ज वितरित केले आहे. जिल्हा बँकेला कर्ज वितरणासाठी ४२६ कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात बँकेने ३०६ कोटी रुपये कर्ज वितरित केले आहे. बँकेने ५० हजार ६८० शेतकऱ्यांना कर्ज दिले असून २४ हजार ११६ शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या बँकेला वेळेवर निधी मिळाला असता तर हा आकडा आणखी वाढला असता.