शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार २० गावे सरकारी नाेंदीअभावी भरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:42 IST

Yawatmal News शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना शासकीय निकषामुळे निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे.

ठळक मुद्दे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही मदतीवर प्रश्नचिन्हप्रशासनाकडून स्वतंत्र अहवाल

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जून ते ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात अती पावसाने कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात यातील निम्म्यापेक्षा कमी गावांची नोंद नुकसानीच्या अहवालात करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एक हजार २० गावे मदतीला मुकण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना शासकीय निकषामुळे निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र अहवाल राज्याच्या कृषी विभागाकडे पाठविला आहे. यामध्ये नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात यावी, यातील निकष शिथील करण्यात यावे, असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात राज्य शासन त्यावर काय निर्णय घेते, या संपूर्ण बाबीवर शेतकऱ्यांची मदत विसंबून राहणार आहे. सद्यस्थितीत ३४ हजार ८०८ हेक्टरसाठी २४ कोटी मागणी करण्यात आली आहे.

३४ हजार हेक्टरचे नुकसानजून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जिल्ह्यातील दोन हजार १५९ गावांनाही अती पावसाचा फटका बसला आहे. प्रत्यक्षात यातील मोजकीच गावे प्रशासनाच्या अहवालात नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात तर अतिवृष्टीच्या निकषामध्ये तीन महसूल मंडळ नोंदविण्यात आले आहे. यामध्ये दारव्हा तालुक्यातील मांगकिन्ही, दारव्हा आणि दिग्रस महसूल मंडळाचा समावेश आहे. या तीन महसूल मंडळात केवळ ६० गावे आहेत. तर जून ते सप्टेंबरच्या अहवालात १६ तालुके नुकसानीत दाखविण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये गावाचा उल्लेख नाही. या चार महिन्यात केवळ दहा हजार हेक्टरचेच नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाच्या लेखी करण्यात आली आहे.

दोन हजार १५९ गावांना मदतीची अपेक्षामदत वाटपासाठी शासनाने निकष जाहीर केले. यामुळे जिल्ह्यातील दोन हजार १५९ गावातील सहा लाख शेतकरी मदतीसाठी अपात्र ठरणार आहे. या सर्वच शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरचे नुकसान झाले. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने २४ कोटी २७ लाख रुपयांची मागणी केली आहे. इतर नुकसानग्रस्त गावांसाठी मार्गदर्शन मागविले आहे.- एम.डी. सिंह,जिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती